अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत ५० जागा लढवणार?

नवाब मलिक यांनी घेतली बैठक; अहवाल अजित पवारांना देणार


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून भाजप-शिवसेना आणि रिपाइंने युतीची घोषणा केल्यानंतर, आता राष्ट्रवादीनेही मुंबईत ५० जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ५० जागा लढवण्याबाबत चर्चा झाली असून, त्याबाबतचा अहवाल बुधवारी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.


मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक मंगळवारी समितीचे अध्यक्ष माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर नवाब मलिक हे महिन्याच्या दर मंगळवारी आढावा बैठक घेत आहेत.


दि. १६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला मुंबई मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागा लढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याबाबतचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी सूपुर्द केला जाणार आहे. या बैठकीला मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

Comments
Add Comment

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

BMC NEWS : मुंबई-३ जलवाहिनीला ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी गळती; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३००० मिलीमीटर

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च