नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ; डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे,जी डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहू शकते, जेणेकरून उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राखता येईल. मुंबईतही भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी दुरुस्तीमुळे काही भागांमध्ये पाणीकपात झाली होती, पण उरणमधील ही समस्या दीर्घकाळ चालणारी आहे.


उरणमधील रानसाई धरणाचा पाणी साठा सध्या चिंताजनक पातळीवर पोहोचला असून,तो स्थिर ठेवण्यासाठी ही कपात अपरिहार्य झाली आहे.या धरणाची क्षमता कमी असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आणि आवश्यकतेनुसार साठवणूक करता येत नाही.त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी उरणमधील रहिवाशांना पाण्यासाठी हाल करावे लागतात.त्यामुळे उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


कधी होणार पाणीकपात?


या पाणीकपातीचा अवलंब दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येणार आहे.जून २०२५ पर्यंत पाणी उपलब्ध राहावे, यासाठी ही संवर्धनात्मक रणनीती आखण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये