मीरा रोडच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधील अमली पदार्थांचा कारखाना केला उद्ध्वस्त

१०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त


भाईंदर : मीरा रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा तपास करत असताना राजस्थान राज्यातील झुनझुनू गावातील अमली पदार्थ बनविणारा कारखाना उघडकीस आला असून पोलिसांनी १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.


मीरा रोड येथील काशिगाव पोलीस ठाण्याचे पथक ४ ऑक्टोबर रोजी गस्त घालत असताना ६ इसमांची संशयावरून झडती घेतली. त्यांच्याकडे १ लाख ३२ हजार रुपयांचे अमली पदार्थ आढळले. त्यांना अटक करून तपास करत असताना आणखीन ४ आरोपी असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पोलीस पथक राजस्थान राज्यातील झुनझुनू गावात पोहोचले. तेथे त्यांना अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना उघडकीस आला.


पोलिसांनी सुमारे १० किलो एमडी, एमडीचे प्री-कर्सर रसायने तसेच एमडी बनविण्याची आवश्यक ती साधनसामग्री (फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, वजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ) असा १०० कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कारखाना चालविणारा अनिल विजयपाल सिहागला अटक केली.


ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक समीर शेख आणि त्यांच्या पथकाने केली.

Comments
Add Comment

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

वकिलाकडून थुंकीने पान उलटण्यावर न्यायाधीशांचा आक्षेप

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी एका वकिलाने थुंकी लावून पान उलटण्यावर

अहमदाबादच्या भक्तांकडून साईचरणी सोन्याची गणेश मूर्ती

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी

भारतीय रेल्वेने ११ वर्षांत तयार केले ४२ हजारांहून अधिक एलएचबी कोच

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ११ वर्षांत (२०१४-२०२५) ४२,६०० हून अधिक एलएचबी कोच (लिंके हॉफमन बुश) तयार केले

अवघ्या १३व्या वर्षी शाळकरी मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात!

दहा शहरांतील अभ्यासातून वास्तव उघड… मुंबई  : देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच