मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांच्या मठाला भेट दिली. या भेटीदरम्यानचे क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


विराट आणि अनुष्का हे दोघेही प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघेही महाराजांसमोर जमिनीवर बसून हात जोडून संवाद साधताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान महाराजांनी ईश्वराशी जोडलेले राहण्याचा संदेश दिला. त्यांचे विचार ऐकताना अनुष्का शर्मा भावुक झाल्याचे दिसून आले असून, तिच्या डोळ्यात अश्रू तरळताना स्पष्ट दिसत आहेत.


या वेळी दोघांचाही साधेपणा विशेष लक्ष वेधून घेत होता. अनुष्काने साधा ड्रेस, शॉल आणि गळ्यात तुळशीची माळ परिधान केली होती. तर विराट कोहलीही तुळशीची माळ घालून महाराजांसमोर नम्रपणे बसलेला दिसत होता. महाराजांच्या उपदेशानंतर अनुष्काने “तुम्ही आमचे आहात महाराज” असे म्हटले असता, महाराजांनी “आपण सर्व ईश्वराचे आहोत” असे उत्तर दिले.


काही दिवसांपूर्वी अनुष्का भारतात आल्याने ती खासगी कारणांसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी आले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यात विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या भेटीमुळे विराट–अनुष्काच्या अध्यात्मिक जीवनाची पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या महापौरपदाचा आज निर्णय?

६६ नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांना भेटणार नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला

Navi Mumbai: महापे MIDC मध्ये अग्नितांडव, उंचच्या उंच उडाल्या आगीच्या ज्वाळा

नवी मुंबई : नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र असलेल्या महापे एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली. येथील 'बिटाकेम'या

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी ; गणरायाचे घेतले दर्शन

कणकवली : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व

Chhatrapati Sambhajinagar News:हुंडा न दिल्यामुळे सुनेचा छळ ,महीलेनं विहीरीत पडुन मृत्यु..सासरच्यांनी रचला प्लॅन

छ.संभाजीनगर: संभाजीनगरमधील सिल्लोड तालूक्यतील पळशी येथे भंयकर प्रकरण बाहेर पडलं आहे.१९ वर्षीय करुणा निकमचे,

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर