भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय पक्षांनी महापालिकांची सत्ता डोळ्यांपुढे ठेवून हालचाली सुरू केल्या आहेत. या वातावरणात भाजपने शरद पवार गटाला धक्का दिला आहे.


धुळे जिल्ह्यात भाजपने शरद पवार गटाला धक्का दिला आहे. धुळे शहराच्या माजी महापौर कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कल्पना महाले यांच्यासोबत माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महाले यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हा राजकीयदृष्ट्या धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाला धक्का असल्याची चर्चा आहे.


निवडणुकीला जेमतेम महिना उरला असताना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे आणि शरद पवार गट कमकुवत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान जिथे शक्य आहे तिथे भाजप युती म्हणून निवडणूक लढणार आहे आणि निवडक ठिकाणी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. जिथे स्वतंत्रपणे लढू तिथे मैत्रीपूर्ण लढती लढू असेही फडणवीस म्हणाले. पुणे मनपात भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ आहे. या स्थितीत तिसऱ्या पक्षाचा फायदा होऊ नये म्हणून एकमेकांविरोधात मैत्रीपूर्ण लढती लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत