भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय पक्षांनी महापालिकांची सत्ता डोळ्यांपुढे ठेवून हालचाली सुरू केल्या आहेत. या वातावरणात भाजपने शरद पवार गटाला धक्का दिला आहे.


धुळे जिल्ह्यात भाजपने शरद पवार गटाला धक्का दिला आहे. धुळे शहराच्या माजी महापौर कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कल्पना महाले यांच्यासोबत माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महाले यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हा राजकीयदृष्ट्या धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाला धक्का असल्याची चर्चा आहे.


निवडणुकीला जेमतेम महिना उरला असताना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे आणि शरद पवार गट कमकुवत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान जिथे शक्य आहे तिथे भाजप युती म्हणून निवडणूक लढणार आहे आणि निवडक ठिकाणी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. जिथे स्वतंत्रपणे लढू तिथे मैत्रीपूर्ण लढती लढू असेही फडणवीस म्हणाले. पुणे मनपात भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ आहे. या स्थितीत तिसऱ्या पक्षाचा फायदा होऊ नये म्हणून एकमेकांविरोधात मैत्रीपूर्ण लढती लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,