महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी होऊन निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी अर्ज करता येतील. अर्जांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. उमेदवारांना २ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. यानंतर ३ जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.



कार्यकाळ संपलेल्या महापालिकांमध्ये आधी कोविड संकट, नंतर आरक्षणाचा पेच यामुळे प्रदीर्घ काळ निवडणुका झाल्या नव्हत्या. आता निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार महिन्याभरात निवडणुका होणार आहेत.



राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन महापालिकांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू केली आहे. आता महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी होऊन निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे. जेमतेम महिन्याभरात नागरिकांना मनपांसाठी लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी मिळणार आहे. यामुळे मोठे राजकीय पक्ष कोणत्या महापालिकेत युती किंवा आघाडी करणार का की एकमेकांविरोधात लढणार याची चर्चा सुरू झाली आहे.



राजकीय युती - आघाडीबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना निवडणूक कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेचे स्वागत केले आणि भाजप निवडणुकीसाठी तयार असल्याचे जाहीर केले. राज्यात महायुतीचे सरकार आहे. पण महापालिकांच्या पातळीवर लढताना भाजप अनेक ठिकाणी शिवसेनेसोबत, काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत तर निवडक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत निवडणुका लढण्याची तयारी करत आहे. पुणे मनपात तसेच राज्यात निवडक ठिकाणी भाजप मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत आहे. महायुतीच्या विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी निवक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. युती, महायुती की मैत्रीपूर्ण लढती याची अधिकृत घोषणा लवकरच करू पण पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रबळ असल्यामुळे तिथे मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता जास्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या सांगितले.

Comments
Add Comment

Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात