नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावणार, तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती

गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शरण या नाही तर मरा असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा पुरता बीमोड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना निर्देश दिले आहे. गृहमंत्र्यांकडून परवानगी मिळाल्यापासून सुरक्षा यंत्रणांनी आक्रमक होत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारी यंत्रणेचा हा आक्रमक पवित्रा बघून घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी शरणागती स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.


महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती स्वीकारली आहे. यामुळे राज्यातल्या नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे. शरण आलेले तिन्ही नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य होते. विदर्भात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला लागून असलेल्या राज्याच्या सीमा भागातील नक्षलवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सरकारच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला यश मिळू लागल्याचे चित्र आहे.


दरेकसा एरिया कमिटी कमांडर रोशन बेडजा (३५) याच्यासह सुभाष रव्वा (२६) आणि रतन पोयाम (२५) गोंदिया पोलिसांसमोर शरण आले आहेत. मागील काही महिन्यांपासून नक्षलवादी हातातील शस्त्र खाली टाकून आणि हातात भारतीय संविधानाची प्रत घेऊन शरण येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अलिकडेच नक्षलवादी भूपती, तारक्का यांनी आत्मसमर्पण केले. याआधी ११ नक्षलवादी शरण आले होते.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा