केईएम रुग्णालयात आता खिलाडूवृत्तीने होणार उपचार ; दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र , लवकरच स्वतंत्र क्रीडा विभाग करणार सुरु

मुंबई : परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात आले आहे. केंद्राच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध होणार आहेत. अशा स्वरूपातील सुविधा उपलब्ध करून देणारे शासकीय रुग्णालयांमधील केईएम हे मुंबईतील पहिले रुग्णालय ठरले आहे. क्रीडापटूंच्या उपचारासाठी आवश्यक असणारे आर्थोस्कोपी शल्यचिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, बायोफिजिसिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ अशा स्वरूपाचे सर्व उपचार एकाच छत्राखाली उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे सध्या हे उपचार केंद्र सुरु केले असले तरी लवकरच याठिकाणी स्वतंत्र क्रीडा विभाग सुरु करणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी नमूद केले.


क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयातील या केंद्राचे लोकार्पण मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते रविवारी १४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, अस्थिरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मोहन देसाई, बाळकृष्ण इंडस्ट्रीच्या विजयालक्ष्मी पोद्दार, अरविंद पोद्दार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून क्रीडापटूंसाठी यास्वरूपाचे योगदान म्हणजे खासगी क्षेत्राची क्रीडा क्षेत्रासाठी असणारी वचनबद्धता आहे. बालकृष्ण इंडस्ट्रीने केईएम रुग्णालयाची निवड करणे, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी म्हटले. खासगी क्षेत्राची क्रीडा क्षेत्रासाठी योगदान करण्याची तयारी ही अतिशय महत्वाची बाब आहे. मुंबईसारख्या क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाट्यामुळे अतिशय गरजेची असणारी क्रीडापटूंसाठीची ही सुविधा निर्माण करणे शक्य झाले आहे. ज्याचा फायदा हा केईएम रुग्णालयाची देशपातळीवरील क्रमवारी उंचावण्यासाठीही निश्चितच होईल, असा विश्वासही गगराणी यांनी व्यक्त केला. क्रीडा क्षेत्राला उत्तमोत्तम उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्राचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. केईएम रुग्णालयात क्रीडा वैद्यकीय विभाग हा एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण क्षमतेने याठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी नमुद केले.


भारतात ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेची तयारी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अशावेळी मुंबईसारख्या महानगरात क्रीडापटूंसाठी असे केंद्र उपलब्ध असणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. या केंद्रात उपचार घेऊन पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंनाही सेवासुविधांचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही गगराणी यांनी व्यक्त केला. खेळताना अथवा व्यायाम करताना दुखापतग्रस्त झालो तर मलाही याठिकाणी उपचार घ्यायला आवडतील, अशी मिश्किल टिप्पणीही गगराणी यांनी याप्रसंगी केली.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६