सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू १२० वर्षांनी बाहेर काढणार

भुवनेश्वर  : ओडिशातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) हाती घेतलेल्या या कामामुळे १२० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच गर्भगृहातून वाळू काढली जाणार आहे.


मंदिर कोसळण्याचा धोका असल्याने त्याला आधार देण्यासाठी ब्रिटिश अभियंत्यांनी १९०३ मध्ये तेथे वाळू भरली होती. या घटनेनंतर १२० वर्षांनंतर गर्भगृहातील वाळू काढण्याचा निर्णय ‘एआयएस’ने घेतल्याने इतकी वर्षे बंद असलेल्या त्या कक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गर्भगृहाच्या आतील वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले असल्याचे तेथे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गर्भगृहात दाबून बसलेल्या वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले आहे. प्राथमिक मोजमापांनुसार गर्भगृहाची भिंत सुमारे आठ मीटर जाड आहे. सूर्य मंदिराची एकूण उंची सुमारे १२७ फूट आहे. पश्चिमेकडे जमिनीपासून सुमारे ८० फूट उंचीवर प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे.


आतापर्यंत काढण्यात आलेल्या साहित्यामध्ये वाळू आणि दगडाचे तुकडे आहेत. हे सर्व नमुने आता वैज्ञानिक विश्लेषणासाठी गोळा करण्यात येत आहेत. ‘एएसआय’च्या प्रारंभिक अहवालांनुसार वाळूने भरलेल्या कक्षात आद्रता आहे. यामुळेच आतल्या भागाची झीज होण्याची किंवा त्याचा नाश होण्याची शक्यता होती.


गर्भगृहातील माती काढताना मंदिराची हानी होऊ नये, यासाठी दहा सदस्यांच्या तज्ज्ञ पथकाकडून डायमंड-ड्रिल तंत्रज्ञान आणि कंपनविरहित यंत्रणा यांचा वापर करून खोलवर ड्रिलिंग केले जात आहे. मंदिराच्या नाजूक खोंडालाइट दगडांच्या रचनेला कोणताही धक्का बसू नये यासाठी सुरक्षेचे उपाय केले जात आहेत.


ड्रिलिंगचे ठिकाण ‘जगमोहन’ (सभा मंडप)च्या पश्चिमेकडील भागात, पहिल्या आणि दुसऱ्या स्तरादरम्यान निश्चित केलेले आहे. तेथून पुढे वाळू बाहेर काढण्यासाठी नियोजित बोगद्याची उभारणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Harshit Rana : अफगाणिस्तानविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी हर्षित राणाचे भारतीय संघात पुनरागमन

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा भारतीय

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत