लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी

मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक


नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अंतिम आणि एकमेव संधी देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, ही सुधारणा प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


योजनेच्या बहुतांश लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील असल्याने ई-केवायसी करताना चुका होणे स्वाभाविक आहे. अशा चुका दुरुस्त करण्याबाबत विभागाकडे अनेक निवेदने प्राप्त झाली होती. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या योजनेत लाभार्थींना संधी देणे गरजेचे असल्याने, ई-केवायसीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.


तसेच, पती किंवा वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांना ई-केवायसी प्रक्रिया स्वतः पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून या महिलांना योजनेचा लाभ सुरळीत मिळावा, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी करण्याबरोबरच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह