राज्यातील ६० ठिकाणी ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ' उभारणार! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नागपूर : विद्यार्थी दशे पासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा ' संस्कार ' शालेय विद्यार्थ्यांच्यावर व्हावा! तसेच वाहन धारक असलेल्या त्यांच्या पालकांच्यात रस्ता सुरक्षिततेबध्दल जनजागृती व्हावी तसेच ज्येष्ठाना विरंगुळा मिळावा या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ' उभारण्याची योजना मोटार परिवहन विभागाने आखली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक म्हणाले की, देशात आणि प्रामुख्याने राज्यांमध्ये वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अत्यंत गरजेचं झाले आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ज्या शहरांमध्ये प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत, त्या शहरात ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ' निर्माण करून तेथे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन करून देणे, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या किमान एक एकर जागेमध्ये एक कोटी रुपये खर्च करून हे ट्राफिक पार्क उभारले जाईल. या पार्कमध्ये दुर्मिळ वनस्पती, विविध आकर्षण फुल झाडे, हिरवळीचे पट्टे असे सुंदर आरेखन असलेले 'प्रबोधन, माहिती व विरंगुळयाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा लाभ शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये वाहतूक नियम प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळणारे जबाबदार नागरिक बनविण्यासाठी तर ज्येष्ठांना मनोरंजनाबरोबर विश्रांतीसाठी होईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


विविध वाहतूक चिन्हे, प्रतिके, वेगमर्यादा पालन करण्याच्या सूचना, सुभाषितांच्या माध्यमातून या उद्यानामध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पालन करण्यासंबंधिचे प्रबोधन करणे, हा याचा मुख्य हेतू आहे . तथापि, या पार्कमध्ये विविध दुर्मिळ वनस्पती आकर्षक फुलझाडे व लँडस्केपिंग च्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र देखील निर्माण केली जाईल.


सध्या मोटार परिवहन विभागाकडे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये हे ' ट्राफिक पार्क ' उभारले जाणार आहेत. जिथे मोटार परिवहन विभागाची जागा नसेल तिथे महापालिका, नगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून अशी जागा विकसित करण्यात येणार आहे. ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफीक पार्क ' निर्मितीचा सर्व खर्च रस्ता सुरक्षा निधीच्या माध्यमातून मोटार परिवहन विभाग करणार आहे. तथापि भविष्यात त्याची देखभाल संबंधित महापालिका अथवा नगरपालिकेने करणे अपेक्षित आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघात ठाणे व मिरा - भाईंदर येथे अशा पद्धतीचे ट्राफिक पार्क यापूर्वी निर्माण केले आहेत. त्याला विद्यार्थी त्यांचे पालक व ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (अभिजीत भोसले) जनसंपर्क अधिकारी मा. मंत्री परिवहन

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त