विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची दीड हजारात विक्री?; चौकशीचे आदेश

नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारे पास दीड हजार रुपयांत विकले जात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. या प्रकारांमुळे दहशतवादीही सहज आत शिरू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी दिले आहेत.


गेल्या वर्षी काही आमदारांच्या तक्रारीनंतर अभ्यागतांसाठी दररोजचे प्रवेश पास देण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही हिवाळी अधिवेशन सुरू होताच सर्व सदस्यांना पासशिवाय कोणालाही विधानभवन परिसरात आणू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दोन दिवसांत २३ आमदारांनी विनापास लोकांना आत नेल्याचे उघड झाले होते.


आता हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी (१२ डिसेंबर) शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी थेट विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करीत खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्यांकडे आमदारांचे पत्र असूनही त्यांना पास मिळाले नाहीत आणि ते दिवसभर बाहेर उभे होते. पण बाहेर दीड हजार रुपये देऊन पास मिळत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने विधिमंडळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दीड हजारात पास मिळत असेल तर दहशतवादी कधीही आत येऊ शकतो. कुणी पैसे घेऊन हे पास जारी केले, याची चौकशी व्हावी”, अशी मागणी त्यांनी केली.


हेमंत पाटील यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच मर्यादित पास देण्याचे सांगितले होते. मात्र आज विधिमंडळ परिसरात एवढी गर्दी आहे की नीट चालता येत नाही. हे सगळे लोक आत कसे आले? इतक्या मोठ्या प्रमाणात पास कुणी आणि का जारी केले?”असे सवाल त्यांनी केले. दोन्ही आमदारांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष कृपाल तुमाने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य