महायुतीमुळे आरक्षणाचा पेच सुटला, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ओबीसी प्रमाणपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारने आरक्षणाचा पेच सोडवला आहे. मराठवाड्यातील मराठ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली आहे. सरकारच्या निर्णयानंतर आता मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फडणवीस सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू केले आहे. या गॅझेटिअरचा संदर्भ घेऊन कुणबी,ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे.


मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करत आंदोलन सुरू होते. फडणवीस सरकारने या आंदोलनाची दखल घेत समाजाला न्याय दिला आहे. शासनाने कुणबी नोंदींचा शोध घेतला. या शोध मोहिमेत अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या.हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. सर्वाधिक ४४५ अर्ज हे परभणी जिल्ह्यातील आहेत. उर्वरित कुणबी अर्जाची चौकशी सुरू आहे.


छत्रपती संभाजीनगर    १४    अर्ज     0    प्रमाणपत्र
जालना                         ७८   अर्ज     ८    प्रमाणपत्र
बीड                             २२    अर्ज    २२   प्रमाणपत्र
लातूर                           १२    अर्ज     ९    प्रमाणपत्र
धाराशिव                      १३    अर्ज     ४    प्रमाणपत्र
परभणी                     ४४५    अर्ज   ४७   प्रमाणपत्र
हिंगोली                          ५    अर्ज    ३     प्रमाणपत्र
नांदेड                            ५    अर्ज    ५     प्रमाणपत्र

Comments
Add Comment

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)