देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं आहे.लातूरमधील त्यांच्या 'देवघर' या निवासस्थानी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील काही दिवसापासून ते आजारी होते. वाढत्या वयानुसार असलेल्या दीर्घ आजारपणामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.


शिवराज पाटील चाकूरकर यांचा अल्प परिचय


शिवराज पाटील चाकूरकर... चाकूर गावातला साधा मुलगा ते अभ्यासू राजकारणी असा प्रवास... त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञानाची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांनी १९६७ मध्ये लातूर नगरपालिकेतून राजकारणात पाऊल ठेवलं. पुढे १९८० ते १९९९ पर्यंत सलग सात वेळा लातूर लोकसभेचं प्रतिनिधित्व... इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश अशा संवेदनशील खात्यांची धुरा सांभाळली.


नंतर १९९१ ते १९९६… लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी संसदेला आधुनिक रूप दिलं. संगणकीकरण, थेट प्रक्षेपण, नव्या ग्रंथालय इमारतीचं बांधकाम, संसदीय कामकाजात पारदर्शकता… हे सर्व त्यांचंच योगदान. इतकंच नव्हे तर देश-विदेशातील संसदीय परिषदांमध्ये भारताचं प्रभावी नेतृत्व केलं. उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची कल्पनाही त्यांचीच.


यानंतर २००४ मधील निवडणुकीत पराभव झाला. तरीही सोनिया गांधींनी त्यांच्यावर विश्वास टाकत गृहमंत्रिपद दिलं. पण २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला. नंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी अतिशय संयमानं काम केलं.


आजच्या राजकारणात जिथे स्वच्छ प्रतिमा दुर्मीळ झालीय, तिथे शिवराज पाटील चाकूरकर अपवाद होते. सत्य साईबाबांचे निष्ठावंत भक्त, लिंगायत समाजाचा अभिमान, कुटुंबवत्सल पिता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक. लातूरच्या ‘देवघर’ निवासस्थानी आज सकाळी साडे सहा वाजता त्यांनी शांततेत देह ठेवला. पण त्यांचा वारसा, त्यांची शिकवण आणि त्यांचं स्वच्छ राजकारण मात्र कायम अमर राहील.

Comments
Add Comment

Shimla Accident : हिमाचलमध्ये कारवर दरड कोसळली, १३ जणांचा मृत्यू तर सहा महिन्याच्या बाळाचा...

शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे.

Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातीळ अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर

Nashik News : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाणी विसर्गात वाढ; 94 हजार 497 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शुक्रवारी (दि. २४) सकाळपासून

Government Hospitals : आता सरकारी रुग्णालयांतील ‘पेशंट’ ठरवणार डॉक्टरांचे रिपोर्ट कार्ड

राज्य सरकारचा निर्णय; हॉटेल्सप्रमाणे सरकारी दवाखान्यांनाही मिळणार स्टार रेटिंग मुंबई(Mumbai) : सरकारी रुग्णालयाचे

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा

TRAI's MAJOR MOVE : रस्ते अपघातांना ब्रेक लावण्यासाठी 'ट्राय'चा मोठा निर्णय; काय आहे अत्याधुनिक 'V2X' तंत्रज्ञान?

नवी दिल्ली: भारतात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे जाणवणारी जीवितहानी ही एक अत्यंत