देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं आहे.लातूरमधील त्यांच्या 'देवघर' या निवासस्थानी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील काही दिवसापासून ते आजारी होते. वाढत्या वयानुसार असलेल्या दीर्घ आजारपणामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.


शिवराज पाटील चाकूरकर यांचा अल्प परिचय


शिवराज पाटील चाकूरकर... चाकूर गावातला साधा मुलगा ते अभ्यासू राजकारणी असा प्रवास... त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञानाची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांनी १९६७ मध्ये लातूर नगरपालिकेतून राजकारणात पाऊल ठेवलं. पुढे १९८० ते १९९९ पर्यंत सलग सात वेळा लातूर लोकसभेचं प्रतिनिधित्व... इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश अशा संवेदनशील खात्यांची धुरा सांभाळली.


नंतर १९९१ ते १९९६… लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी संसदेला आधुनिक रूप दिलं. संगणकीकरण, थेट प्रक्षेपण, नव्या ग्रंथालय इमारतीचं बांधकाम, संसदीय कामकाजात पारदर्शकता… हे सर्व त्यांचंच योगदान. इतकंच नव्हे तर देश-विदेशातील संसदीय परिषदांमध्ये भारताचं प्रभावी नेतृत्व केलं. उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची कल्पनाही त्यांचीच.


यानंतर २००४ मधील निवडणुकीत पराभव झाला. तरीही सोनिया गांधींनी त्यांच्यावर विश्वास टाकत गृहमंत्रिपद दिलं. पण २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला. नंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी अतिशय संयमानं काम केलं.


आजच्या राजकारणात जिथे स्वच्छ प्रतिमा दुर्मीळ झालीय, तिथे शिवराज पाटील चाकूरकर अपवाद होते. सत्य साईबाबांचे निष्ठावंत भक्त, लिंगायत समाजाचा अभिमान, कुटुंबवत्सल पिता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक. लातूरच्या ‘देवघर’ निवासस्थानी आज सकाळी साडे सहा वाजता त्यांनी शांततेत देह ठेवला. पण त्यांचा वारसा, त्यांची शिकवण आणि त्यांचं स्वच्छ राजकारण मात्र कायम अमर राहील.

Comments
Add Comment

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश