निर्ढावलेपणाला आळा घालणार!" बोगस जात प्रमाणपत्र घोटाळ्यावर मंत्री संजय शिरसाट यांची सभागृहात कठोर भूमिका

नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणावरून आज (गुरुवारी) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन समितीच्या कामकाजातील त्रुटी मान्य केल्या आणि यापुढे कायद्याचे काटेकोर पालन करण्यावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट केले.



दोन अधिकाऱ्यांवर निलंबन


सामाजिक न्याय मंत्री (संजय राठोड) यांनी सभागृहात माहिती दिली की, जात पडताळणी समितीने जात वैधता अधिनियम न पाळल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. शासनाकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या स्वरूपात चौकशी सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, समितीचे सदस्य सचिव आणि उपायुक्त अशा एकूण दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समितीचे तत्कालीन अधिकारी आर. एल. गगराणी हे निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यावर सध्या नियमानुसार कारवाई करता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.



विरोधकांच्या आक्रमकतेला मंत्र्यांचे परखड उत्तर!


चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी, विशेषतः आमदार अनिल परब यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली. मात्र, वारंवार हस्तक्षेप आणि आरोपांमुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रशासनाची बाजू ठामपणे मांडली. विरोधी पक्षाच्या आग्रही भूमिकेवर शिरसाट संतापले आणि त्यांनी स्पष्ट केले की, शासन या विषयावर गांभीर्याने कारवाई करत आहे.



कारभारात सुधारणा आणि पारदर्शकता


मंत्री संजय शिरसाट यांनी प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आणि प्रशासनाचा हेतू स्पष्ट केला, काही अधिकाऱ्यांनी दोन वर्षात साधा प्रतिसादही दिला नसल्याचे त्यांनी कबूल केले, मात्र या निर्ढावलेपणाला आळा घालण्यासाठी शासन विषय गांभीर्याने घेत आहे. "सामान्य माणूस कोर्टात जाऊ शकत नाही. त्यामुळे लोक गैरप्रकाराबाबत आवाज उठवत असतील तर त्यांना न्याय मिळायलाच हवा," असे ते म्हणाले. जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरुद्ध शासन दरबारी अपील करण्याची व्यवस्था व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकाला त्वरित दिलासा मिळू शकेल.


बुलढाणा बोगस जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी विधान परिषदेत झालेल्या जोरदार चर्चेनंतर, सभापती राम शिंदे यांनी "या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करून योग्य ती कारवाई करतील." असे संकेत दिले.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील