पुढील ५ वर्षात केवळ उर्जा प्रकल्पात अदानी समुह ७५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार - गौतम अदानी

धनबाद: अदानी समुह पुढील ५ वर्षात ७५ अब्ज डॉलर रूपये झारखंडमध्ये गुंतवणूक करणार आहे असे दस्तुरखुद्द उद्योगपती व समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कोळशातील गुंतवणूक पारंपरिक अर्थव्यवस्थेतील वाटू शकते पण या उर्जेशिवाय नवी अर्थव्यवस्था चालणे शक्य नाही ' असे विधान त्यांनी केले आहे. अदानी समुह झारखंडमध्ये खासकरून धनबादमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचेही अदानी यांनी स्पष्ट केले आहे. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीच्या संधी आहेत. येणाऱ्या नजीकच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत प्रगती दिसले. लोकांना ही पारंपरिक अर्थव्यवस्था वाटू शकते पण हिच्याशिवाय नवी अर्थव्यवस्था चालणार नाही' असे विधान गौतम अदानी यांनी केले आहे.


या ७५ अब्ज डॉलर व्यतिरिक्त समुह मोठ्या प्रमाणात देशातील इतर भागातही गुंतवणूक वाढवत आहे. यापूर्वी अदानी समुहाने गुजरात खावडा येथे जगातील सर्वात मोठे ५२० किलोमीटर परिसरात पसरलेले अक्षय उर्जा (Renewable Energy) प्रकल्पाची घोषणा केली होती. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत पार्क ३० गिगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारेल असे कंपनीने नमूद केले होते. याशिवाय बोलताना अदानी म्हणाले आहेत की,'सहयोगी जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळ्यांचे युग कोसळत आहे. दुर्मिळ खनिजांवरील संघर्ष, शुल्क आणि मोडलेले करार नित्याचे होत आहेत आणि प्रमुख संस्थांना त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या नियमांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहेत.'धनबाद येथील प्रकल्पाबाबत बोलताना गौतम अदानी यांनी स्पष्ट केले आहे की,'१० गिगावॉट क्षमतेचे प्रकल्प आधीच कार्यान्वित झाल्यामुळे कंपनी जगातील सर्वात कमी खर्चाची हरित ऊर्जा प्रदान करण्याच्या मार्गावर आहे'

Comments
Add Comment

Zeeshan Siddique : सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत ?

मुंबई : झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदारकीची शपथ घेतली.

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Radhakrishna Vikhe Patil : “जरांगेंचं समाधान होत असेल तर राजीनाम्यास तयार”; विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं असून, मराठा आंदोलक नेते मनोज

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट