पुढील ५ वर्षात केवळ उर्जा प्रकल्पात अदानी समुह ७५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार - गौतम अदानी

धनबाद: अदानी समुह पुढील ५ वर्षात ७५ अब्ज डॉलर रूपये झारखंडमध्ये गुंतवणूक करणार आहे असे दस्तुरखुद्द उद्योगपती व समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कोळशातील गुंतवणूक पारंपरिक अर्थव्यवस्थेतील वाटू शकते पण या उर्जेशिवाय नवी अर्थव्यवस्था चालणे शक्य नाही ' असे विधान त्यांनी केले आहे. अदानी समुह झारखंडमध्ये खासकरून धनबादमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचेही अदानी यांनी स्पष्ट केले आहे. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीच्या संधी आहेत. येणाऱ्या नजीकच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत प्रगती दिसले. लोकांना ही पारंपरिक अर्थव्यवस्था वाटू शकते पण हिच्याशिवाय नवी अर्थव्यवस्था चालणार नाही' असे विधान गौतम अदानी यांनी केले आहे.


या ७५ अब्ज डॉलर व्यतिरिक्त समुह मोठ्या प्रमाणात देशातील इतर भागातही गुंतवणूक वाढवत आहे. यापूर्वी अदानी समुहाने गुजरात खावडा येथे जगातील सर्वात मोठे ५२० किलोमीटर परिसरात पसरलेले अक्षय उर्जा (Renewable Energy) प्रकल्पाची घोषणा केली होती. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत पार्क ३० गिगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारेल असे कंपनीने नमूद केले होते. याशिवाय बोलताना अदानी म्हणाले आहेत की,'सहयोगी जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळ्यांचे युग कोसळत आहे. दुर्मिळ खनिजांवरील संघर्ष, शुल्क आणि मोडलेले करार नित्याचे होत आहेत आणि प्रमुख संस्थांना त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या नियमांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहेत.'धनबाद येथील प्रकल्पाबाबत बोलताना गौतम अदानी यांनी स्पष्ट केले आहे की,'१० गिगावॉट क्षमतेचे प्रकल्प आधीच कार्यान्वित झाल्यामुळे कंपनी जगातील सर्वात कमी खर्चाची हरित ऊर्जा प्रदान करण्याच्या मार्गावर आहे'

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती