रविंद्र चव्हाणांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आगामी डावपेचांबाबत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतल्या इतर घटक पक्षांसोबत कशा प्रकारे समन्वय राखायचा या संदर्भात रविंद्र चव्हाण आणि अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली. संघटनात्मक नियोजनासाठी अमित शाह यांनी रविंद्र चव्हाणांना मोलाचे मार्गदर्शन केले.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अलिकडेच चर्चा झाली. समन्वयाबाबत काही निर्णय झाले. या निर्णयांची माहिती देणे आणि पुढील नियोजनासाठी मार्गदर्शन घेणे या हेतूनेच रविंद्र चव्हाणांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. भेट सकारात्मक वातावरणात झाली.


राज्यात २ डिसेंबर रोजी एकूण २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान झाले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यानंतर राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी केली जाणार आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आणि जानेवारी २०२६ मध्ये राज्यातल्या २९ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व होणार असलेल्या निवडणुकांकरिता डावपेच आखण्यासाठी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती