राज ठाकरेंना कोर्टाकडून एक महिन्याची डेडलाईन… पण कशासाठी? कोर्टात काय घडलं?

ठाणे : रेल्वे भरतीत उत्तर भारतीयांना जास्त संधी मिळते असा आरोप करत मनसेने ठाण्यात गडकरी रंगायतन चौकात एक सभा घेतली. या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली. ही तलवार म्यानातून काढून उपस्थितांना दाखवण्यात आली. राज ठाकरे यांनी रेल्वे भरती प्रकरणात अशी वक्तव्ये केली होती ज्यामुळे तणाव निर्माण झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कल्याण कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता.आता हा खटला ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला आहे.या खटल्याची न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या दालनात सुनावणी झाली.


राज ठाकरे यांच्यासह या खटल्यातील इतर आरोपी असलेले सात जण कोर्टात उपस्थित होते. मनसेच्या वरिष्ठ फळीतील नेते नितीन सरदेसाई,अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव हे देखील कोर्टात हजर होते.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावणी दरम्यान न्यायालयाने थेट विचारणा केली,“तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?” प्रश्नावर राज ठाकरे यांनी कोणताही संभ्रम न ठेवता,“मला गुन्हा कबूल नाही,” असे स्पष्ट उत्तर दिले.राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्यानंतर,हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीने न्यायाधीशांनी सूचक टिप्पणी केली.न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाचे विधान केले.तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यापुढे यायची गरजही लागणार नाही.”तसेच, सहकार्य मिळाल्यास हे प्रकरण जून महिन्यापर्यंत निश्चितपणे संपवता येईल,असे कोर्टाने नमूद केले.यावेळी राज ठाकरे यांच्या कायदेशीर बाजूचे प्रतिनिधित्व ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी केले.

Comments
Add Comment

बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी

टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : पनवेलमध्ये पळस्पे फाटा परिसरात ओएनजीसीच्या सीबीएसई बोर्डाच्या (केंद्रीय विद्यालयाच्या) स्कूल बसला

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना

Vijay Mallya: तुम्हाला भारतात यावेच लागेल, ही तुमची शेवटची संधी; उच्च न्यायालयाने विजय मल्याला बजावले

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१२ फेब्रुवारी) फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध कडक टिप्पणी