राज ठाकरेंना कोर्टाकडून एक महिन्याची डेडलाईन… पण कशासाठी? कोर्टात काय घडलं?

ठाणे : रेल्वे भरतीत उत्तर भारतीयांना जास्त संधी मिळते असा आरोप करत मनसेने ठाण्यात गडकरी रंगायतन चौकात एक सभा घेतली. या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली. ही तलवार म्यानातून काढून उपस्थितांना दाखवण्यात आली. राज ठाकरे यांनी रेल्वे भरती प्रकरणात अशी वक्तव्ये केली होती ज्यामुळे तणाव निर्माण झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कल्याण कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता.आता हा खटला ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला आहे.या खटल्याची न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या दालनात सुनावणी झाली.


राज ठाकरे यांच्यासह या खटल्यातील इतर आरोपी असलेले सात जण कोर्टात उपस्थित होते. मनसेच्या वरिष्ठ फळीतील नेते नितीन सरदेसाई,अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव हे देखील कोर्टात हजर होते.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावणी दरम्यान न्यायालयाने थेट विचारणा केली,“तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?” प्रश्नावर राज ठाकरे यांनी कोणताही संभ्रम न ठेवता,“मला गुन्हा कबूल नाही,” असे स्पष्ट उत्तर दिले.राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्यानंतर,हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीने न्यायाधीशांनी सूचक टिप्पणी केली.न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाचे विधान केले.तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यापुढे यायची गरजही लागणार नाही.”तसेच, सहकार्य मिळाल्यास हे प्रकरण जून महिन्यापर्यंत निश्चितपणे संपवता येईल,असे कोर्टाने नमूद केले.यावेळी राज ठाकरे यांच्या कायदेशीर बाजूचे प्रतिनिधित्व ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी केले.

Comments
Add Comment

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी