गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचा विचारही करत आहे. पासपोर्ट निलंबित झाला अथवा रद्द झाला तर संबंधित व्यक्ती परदेशात प्रवास करू शकत नाही. परदेशात असेल तर पासपोर्ट रद्द झाल्यास संबंधित व्यक्तीला अटक करुन तातडीने मायदेशी पाठवले जाण्याची शक्यता असते.


गोव्यातील प्रसिद्ध बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब आगीच्या घटनेत पोलिसांची कारवाई सातत्याने तीव्र होत आहे. गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणातील नवीन माहिती अशी आहे की सीबीआय किंवा गोवा पोलिसांकडे लुथरा बंधूंबद्दल कोणतीही ताजी माहिती नाही. लुथरा बंधू थायलंडमध्ये आहेत की इतरत्र पळून गेले आहेत याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही.


गोवा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी, कॅफेचा सह-मालक अजय गुप्ता याला दिल्लीहून ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले आहे. पोलीस पथक त्याला थेट अंजुना पोलिस ठाण्यात घेऊन गेले,जिथे त्याची सविस्तर चौकशी केली जात आहे.


३६ तासांचा ट्रान्झिट रिमांड


दिल्लीच्या साकेत न्यायालयाने १० डिसेंबर रोजी अजय गुप्ता याचा गोवा पोलिसांना ३६ तासांचा ट्रान्झिट रिमांड दिला. या आदेशानंतर आरोपीला दिल्लीहून गोव्यात आणण्यात आले.अजय गुप्ता हा क्लबच्या मालकी रचनेत लुथ्रा बंधूंचा भागीदार असल्याचे म्हटले जाते आणि गुंतवणुकीपासून ते कामकाजापर्यंत त्याची भूमिका पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी आहे.

Comments
Add Comment

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे