गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचा विचारही करत आहे. पासपोर्ट निलंबित झाला अथवा रद्द झाला तर संबंधित व्यक्ती परदेशात प्रवास करू शकत नाही. परदेशात असेल तर पासपोर्ट रद्द झाल्यास संबंधित व्यक्तीला अटक करुन तातडीने मायदेशी पाठवले जाण्याची शक्यता असते.


गोव्यातील प्रसिद्ध बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब आगीच्या घटनेत पोलिसांची कारवाई सातत्याने तीव्र होत आहे. गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणातील नवीन माहिती अशी आहे की सीबीआय किंवा गोवा पोलिसांकडे लुथरा बंधूंबद्दल कोणतीही ताजी माहिती नाही. लुथरा बंधू थायलंडमध्ये आहेत की इतरत्र पळून गेले आहेत याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही.


गोवा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी, कॅफेचा सह-मालक अजय गुप्ता याला दिल्लीहून ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले आहे. पोलीस पथक त्याला थेट अंजुना पोलिस ठाण्यात घेऊन गेले,जिथे त्याची सविस्तर चौकशी केली जात आहे.


३६ तासांचा ट्रान्झिट रिमांड


दिल्लीच्या साकेत न्यायालयाने १० डिसेंबर रोजी अजय गुप्ता याचा गोवा पोलिसांना ३६ तासांचा ट्रान्झिट रिमांड दिला. या आदेशानंतर आरोपीला दिल्लीहून गोव्यात आणण्यात आले.अजय गुप्ता हा क्लबच्या मालकी रचनेत लुथ्रा बंधूंचा भागीदार असल्याचे म्हटले जाते आणि गुंतवणुकीपासून ते कामकाजापर्यंत त्याची भूमिका पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच