गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरण ;अखेर लुथरा ब्रदर्सना अटक

गोव्यातील बिर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता.ज्या रात्री ही घटना घडली,त्याच रात्री या क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा देश सोडून थायलंडला पळून गेले.या दोघांना आता तिथे ताब्यात घेण्यात आलं आहे. याआधी गोवा पोलिसांनी नाईट क्लबच्या पाच कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना अटक केली आहे.


आग प्रकरणाचा तपास सुरू असताना गोवा पोलिसांना दिसून आलं की सात डिसेंबर रोजी मध्यरात्री १.१७ वाजता ‘मेक माय ट्रिप’ या अॅपवरून थायलंडला जाणाऱ्या विमानाची तिकिटं बुक करण्यात आली होती.त्यावेळी आपत्कालीन पथकं क्लबमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होती. एकीकडे अग्निशमन दल आग विझवण्यासाठी आणि तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे लुथरा बंधू देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते.तर लुथरा बंधू फरार नव्हते, ते बिझनेस ट्रिपला गेले होते,अशी बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली होती. दिल्लीच्या एका न्यायालयाने लुथरा बंधूंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला.लुथरा ब्रदर्सच्या वकिलांनी कोर्टात असाही दावा केला की ते दोघं फक्त क्लबचे परवानाधारक होते. क्लबचं दैनंदिन कामकाज कर्मचारी हाताळत होते.


क्लबला सहा डिसेंबर रोजी मध्यरात्री आग लागली होती आणि अवघ्या काही क्षणांतच त्या आगीने संपूर्ण क्लबला वेढलं होतं. याप्रकरणी आठ दिवसांत चौकशी अहवाल तयार होईल. राज्य सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती. तसंच सर्व मनोरंजन स्थळांवर सुरक्षेची तपासणी कडक केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Comments
Add Comment

दादरमध्ये सलग चौथ्या दिवशी कारवाई जोरात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु

मुंबईची खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत ६३ टक्के सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत मुंबई महानगरपालिकेच्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर

भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९