भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे 'एक दिवस सिंध पुन्हा भारतात परत येईल' हे वक्तव्य मागील कही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या वक्तव्यानंतर पाकिस्तानमधील आंदोलनाला बळ मिळाल्याची चर्चा आहे. या आंदोलनाला अधिक बळ मिळाल्यास पाकिस्तानसाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार जिये सिंध मुत्तहिदा महाजच्या रविवारच्या मोर्चाचा मार्ग आयत्यावेळी बदलण्यात आला. यामुळे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ४५ जणांना अटक झाली आहे. आणखी काही जणाना अटक होण्याची शक्यता आहे. या हिंसाचारात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे निर्देश सरकारने पोलिसांना दिले आहेत.