बारामती, इंदापूर पुण्यात ईडीची छापेमारी १०८ कोटींच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी नियामकांची मोठी कारवाई

पुणे: निष्पाप गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबत व १०८.३० कोटी रुपयांच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी बारामती व इंदापूर व पुणे जिल्ह्यातील ५ ठिकाणांवर छापे घालण्यात आले आहेत. विद्यानंद डेअरी प्रायव्हेट लिमिटेड, आनंद सतीश लोखंडे, व विद्यानंद अँग्रोफिड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर ही अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate ED) हे छापे टाकले आहेत. यापैकी दोन धाडी पुण्यात, दोन धाडी बारामती व एक इंदापूर तालुक्यात घालण्यात आलेली आहे. ईडीने कलम १७ मनी लॉन्ड्रिंग कायदा २०२२ अंतर्गत ही कारवाई सुरू केलेली असून संबंधित प्रकरणात संशयितांची सखोल चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरणात विद्यानंद डेअरी, विद्यानंद अँग्रोफिड या दोन कंपनीच्या माध्यमातून लोखंडे व त्यांच्या परिवाराने गुंतवणूकदारांना मोठी स्वप्न दाखवून कंपनीच्या अवास्तविक संभाव्य नफ्याची माहिती देत मोठी रक्कम प्राप्त केली असल्याची माहिती ईडीकडून मिळत आहे.


कथित प्रकरणात आरोपींनी वास्तविक ज्या कारणासाठी गुंतवणूक निधी मिळवला होता त्यासाठी नसून भलत्याच कारणांसाठी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून पैसे दुसरीकडे वळते केले आहेत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उद्योगाला लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी व भांडवलासाठी गुंतवणूकदारांकडून हा निधी मिळविण्यात आला होता मात्र गुंतवणूक ज्या उद्देशाने करण्यात आली होती ती न होता कंपनीने निधी वळवला अशी तक्रार ईडीकडे तक्रारदारांनी दाखल केली होती. त्यावर बुधवारी ईडीने संबंधित आरोपीच्या ठिकाणी छापेमारी करत चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात कलम १७ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत लोखंडे व त्यांच्या दोन कंपन्यावर एफआरआर दाखल केला आहे.

Comments
Add Comment

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी