नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या आहेत. पण अचानक रेल्वे प्रशासनाने प्रस्तावीत मार्गात बदल केला आहे. यामुळे नाशिककर संतापले आहेत.


पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग आता अहिल्यानगर - शिर्डीमार्गे जाणार आहे. या बदलामुळे संगमनेरसह संपूर्ण दक्षिण अहिल्यानगर जिल्हा रेल्वेसेवेपासून दूर जाणार आहे. स्थानिकांच्या विकासाच्या संधी हिरावून घेणारा हा निर्णय असल्याचे संगमनेरमधील संघटनांचे मत आहे. नाशिक - पुणे रेल्वेमार्गाचे तीन वेळा सर्वेक्षण झाले असताना अचानक मार्ग बदलण्यात आल्याने नाराजी पसरली आहे.


नाशिक- पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे व्हावा हे आपले अनेक वर्षांचे स्वप्न आहे, या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०२० मध्ये मंजूर झाला होता. महारेलने भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु केली होती, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात भूसंपादनही झाले होते. मात्र २०२५ मध्ये अचानक शिर्डी मार्गे नव्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. अहिल्यानगर , संगमनेर मार्गे होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना आपला माल पुणे शहरात पोहोचवण्यास मदत होईल इतकंच नाही तर पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. हा मुद्दा अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात मांडला आहे. तर जिल्ह्यातील राजकारण दूर ठेवून या निर्णयासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन