बार्शीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत गटाची एक हाती सत्ता

बार्शी: बार्शी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने एक हाती बाजी मारली आहे. त्यामुळे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाआधी बार्शीत लिटमस चाचणी झाली आणि त्यात माजी आमदार राजेंद्र राऊत हे यशस्वी झाले, अशी चर्चा सुरू आहे. या निवडणूकीत माजी आमदार राजेंद्र राऊत विरूद्ध विद्यमान आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीमुळे बार्शीत राजकीय वातावरण तापले होते. कारण बार्शी तालुक्यातील पारंपारिक प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत हे बाजार समितीच्या निवडणुकीत आमने सामने आले होते. सोपल आणि राऊत या दोन्ही गटांकडून मोठ्या अटीतटीने निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीतील महत्त्वाची गोष्ट बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरातील कोणीही उमेदवार नव्हता.


बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनेलचे व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेले होते. रविवार, ७ डिसेंबर रोजी १६ जागांसाठी चुरशीने ९६.९८ टक्के मतदान झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी (९ डिसेंबर) मतमोजणी करण्यात आली, ज्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोपल गटाचा धुव्वा उडवल्याचे चित्र दिसले. दरम्यान २१ डिसेंबरला नगरपरीषदेचा निकाल लागणार आहे. त्या अगोदरच बाजार समितीच्या निवडणूकीचा निकाल लागल्याने बार्शीत लिटमस चाचणी यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे.





राऊत गटाच्या बळिराजा विकास आघाडीचे विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते :


सुरेश गुंड (८१५)

बाबा गायकवाड (७९०)

विजय गरड (८०४)

अभिजित कापसे (७९८)

प्रभाकर डंबरे (८१८)

रविकांत साळुंखे (७९१)



यशवंत माने (८१३)



Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती