मुंबई पालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतील गैरव्यवहाराचे ऑडिट होणार

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत घोषणा


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘दत्तक वस्ती’ योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता होत असल्याच्या गंभीर आरोपांवर अखेर राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी विधानसभेत केली.


मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा लावून धरला होता. झोपडपट्टी भागातील कचरा संकलनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेत नियमांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे साटम यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या योजनेनुसार १५० कुटुंबे किंवा सुमारे ७५० लोकसंख्येच्या झोपडपट्टी भागासाठी किमान १५ कामगार नेमणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश स्वयंसेवी संस्था केवळ ५ ते १० कामगारच ठेवतात. उरलेल्या कामगारांच्या मानधनाचा अपहार होतो, असा गंभीर आरोप साटम यांनी केला. तसेच, झोपडपट्टी भागात दिवसातून दोन वेळा कचरा उचलणे अनिवार्य असतानाही प्रत्यक्षात ते होत नसल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे दिसतात, असेही त्यांनी नमूद केले.



योजनेचे निकष बदला


महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा थेट आरोप करीत साटम यांनी योजनेचे निकष बदलण्याची मागणी केली. “७५० लोकसंख्येचा निकष ५०० करण्यात यावा, कामगारांचे मानधन वाढवावे; पण संबंधित भागात पुरेसे कामगार नेमले जायला हवेत,” असे मत त्यांनी मांडले. आमदार साटम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी “मुंबई महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेचे ऑडिट लवकरच करण्यात येईल,” अशी ग्वाही सभागृहात दिली.

Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका