मुंबई पालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतील गैरव्यवहाराचे ऑडिट होणार

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत घोषणा


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘दत्तक वस्ती’ योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता होत असल्याच्या गंभीर आरोपांवर अखेर राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी विधानसभेत केली.


मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा लावून धरला होता. झोपडपट्टी भागातील कचरा संकलनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेत नियमांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे साटम यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या योजनेनुसार १५० कुटुंबे किंवा सुमारे ७५० लोकसंख्येच्या झोपडपट्टी भागासाठी किमान १५ कामगार नेमणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश स्वयंसेवी संस्था केवळ ५ ते १० कामगारच ठेवतात. उरलेल्या कामगारांच्या मानधनाचा अपहार होतो, असा गंभीर आरोप साटम यांनी केला. तसेच, झोपडपट्टी भागात दिवसातून दोन वेळा कचरा उचलणे अनिवार्य असतानाही प्रत्यक्षात ते होत नसल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे दिसतात, असेही त्यांनी नमूद केले.



योजनेचे निकष बदला


महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा थेट आरोप करीत साटम यांनी योजनेचे निकष बदलण्याची मागणी केली. “७५० लोकसंख्येचा निकष ५०० करण्यात यावा, कामगारांचे मानधन वाढवावे; पण संबंधित भागात पुरेसे कामगार नेमले जायला हवेत,” असे मत त्यांनी मांडले. आमदार साटम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी “मुंबई महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेचे ऑडिट लवकरच करण्यात येईल,” अशी ग्वाही सभागृहात दिली.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी बीडीडी घरांची मोठी सोडत; वरळी आणि नायगाव मध्ये सर्वाधिक घरांचे वितरण

मुंबई : मुंबईकरांसाठी बीडीडीने घरांची सोडत जाहीर केली आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ

गृहविभागाच्या अपर मुख्य सचिव पदी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या गृहविभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला असून सनदी अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर

कूपर रुग्णालय परिसरातील २०० फेरीवाल्यांच्या वाढीव बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अंधेरी (पश्चिम) येथील राम गणेश गडकरी मार्ग (इर्ला मार्ग) परिसरातील सुमारे २०० अनधिकृत

नवी मुंबई एअरपोर्टला मिळणार गोल्डन लाईन; मेट्रो ८ द्वारे जोडली जाणार 'ही' स्थानके

नवी मुंबई : नवी मुंबई एअरपोर्ट पर्यंतचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या

आयएसएफ २०२५ अंतर्गत ‘वन इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत अरजित मोरे विजेता

मुंबई  : महाराष्ट्रातील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी अरजित अमोल मोरे यांची ‘वन इनोव्हेशन – टुवर्ड्स अ सेल्फ रिलायंट

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक 'सलामी ' मुंबई  : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात