श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे जेतेपद भारतीय संघाने पटकावले. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघाने हे जेतेपद पटकावले. यानंतर विश्रांतीवर असलेला भारतीय संघ श्रीलंका दौरा खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.


भारतीय महिला संघ यंदाच्या वर्षात अखेरची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असणार आहे. तर महिला विश्वचषक अंतिम सामन्यातील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीनंतर शफाली वर्माला टी-२० संघात संधी मिळाली आहे. तर राधा यादवला टी-२० संघात संधी मिळालेली नाही. तर गोलंदाजत श्रीचरणीला संधी देण्यात आली आहे.


महिला विश्वचषकानंतर स्मृती मानधनाचे लग्न हा सर्वात चर्चेचा विषय ठरला होता. पण लग्नाच्या दिवशीच स्मृतीचे लग्न स्थगित करण्यात आले. त्यानंतर श्रीलंका मालिकेसाठी संघ जाहीर होण्याच्या दोन दिवसआधीच स्मृती मानधनाने सिने संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी लग्न मोडलं असल्याची घोषणा तिने केली. यानंतर आता पहिल्यांदाच स्मृती मानधना मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे. स्मृती मानधना या संघाची उपकर्णधार असेल.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), श्रीचरणी, वैष्णवी शर्मा

भारत-श्रीलंका मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक


२१ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, पहिला टी-२० सामना, विशाखापट्ट्णम
२३ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, दुसरा टी-२० सामना, विशाखापट्ट्णम
२६ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, तिसरा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम
२८ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, चौथा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम
३० डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, पाचवा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम

Comments
Add Comment

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत

जेम्स नीशमच्या ‘त्या’ षटकामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला

संजू सॅमसन बनला क्रिकेट विश्वाचा नवा ‘फायनल बॉस’!

कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीस अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक

अभिषेक शर्माने नॉकआउटमध्ये विक्रमी अर्धशतकासह रचला इतिहास

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक