तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिका सातत्याने व्यापक उपाययोजना राबवत आहे. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून ७५ वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या तसेच वहनक्षमता गमावलेल्या जलवाहिन्यांच्या बदलाची महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जात आहे. मोठ्या व्यासाच्या नव्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने अंथरण्‍यात येत असल्यामुळे पाणीगळती, दूषित पाणीपुरवठा आणि रस्‍ते खचणे यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. या मोहिमेतील एक निर्णायक टप्पा म्हणून तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची जीर्ण झालेली जलवाहिनीच्या बदलाची कार्यवाही मंगळवारी ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पूर्ण करण्यात आली आहे.


या कामाचे स्वरूप अत्यंत जटिल, आव्हानात्मक व जोखमीचे होते. जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे अत्यावश्यक काम काल सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले. हे काम मंगळवारी ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता पूर्ण झाले. मंगळवारी या प्रक्रियेस साधारणतः २८ तासांचा कालावधी लागला. जल अभियंता विभागाच्या सातत्यपूर्ण, नियोजित आणि युद्धपातळीवरील प्रयत्नांमुळे हे काम नियोजित वेळेनुसार, यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी पूर्ण करण्यासाठी जल अभियंता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट समन्वय राखून अथक परिश्रम घेतले. या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य केल्याबद्दल १७ प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) नागरिकांचे मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत आभार मानण्‍यात येत आहे. जलवाहिनी बदलण्‍यात आल्‍यानंतर आता १७ प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरळीत होत आहे.


मुंबईतील पाणीपुरवठा यंत्रणेचा कणा असलेल्या अनेक जलवाहिन्या या ब्रिटिशकालीन किंवा ७०–८० वर्षांपूर्वीच्या आहेत. जीर्ण जलवाहिन्‍यांमुळे पाणीपुरवठ्यात अडथळे, भूमिगत गळती आणि वहनक्षमता कमी होत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सातत्याने दुरुस्ती, डागडुजी, तसेच आधुनिक आणि सक्षम जलवाहिन्‍या अंथरण्‍याची कार्यवाही करत आहे. सुरक्षित, स्वच्छ आणि अखंडित पाणीपुरवठा हा मुंबईकरांचा मूलभूत हक्क असून, तो अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

Comments
Add Comment

Mhada : म्हाडा सोडतीसाठी २८ मेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : म्हाडातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व)

MNS Corporator : निधी नका देऊ, माझा प्रभाग दत्तक घ्या; मनसे नगरसेविकेने महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली विनंती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या स्तरावर महापौरांच्या माध्यमातून २५०

Kharghar : खारघरमधील 'गोदरेज' आणि 'भगवती विहान' प्रकल्पांच्या नियमबाह्य कामांची सात दिवसांत चौकशी करा; महसूल मंत्री

मुंबई:पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर शहरात सुरू असलेल्या 'गोदरेज प्रॉपर्टीज' आणि 'भगवती विहान' या

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Shambhuraj Desai : पंढरपूर येथील पाच एकर जागेत भक्तनिवास होणार : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई:  पंढरपूर येथील पाच एकर जागेत माजी सैनिक कल्याण विभाग, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे देवस्थान व पर्यटन

Mhada : मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत शासन सकारात्मक : प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत शासन सकारात्मक असून या कामाला गती