शिवसेनेचे आमदार भाजपत घेऊन काय करू?

मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल; शिवसेना मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे


नागपूर : “शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचे आहे? मित्रपक्षाचे आमदार घेऊन आम्ही असे राजकारण करत नाही. उलट, शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. भविष्यात शिवसेना, भाजप आणि आमची महायुती आणखी मजबूत होताना दिसेल”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांना दिले.


शिउबाठा गटाच्या काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे (शिंदे) २२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘उद्या कोणी असाही दावा करू शकते की उबाठाचे २० आमदार भाजपमध्ये येत आहेत. असले दावे करून काही होत नाही. आम्हाला शिवसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? आम्ही मित्रपक्ष मजबूत करण्यासाठी काम करतो, त्यांना कमकुवत करण्यासाठी नाही.’’


 

‘वंदे मातरम’ला तोडणे हे काँग्रेसचे पाप




  1.  ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हिवाळी अधिवेशनात सोमवारी या गीताचे गायन करण्यात आले. उबाठा गटाने त्यावरूनही राजकारण केले. त्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘वंदे मातरमवर कधीच बंदी नव्हती. जो काही अपमान झाला, त्याला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव मंजूर करून वंदे मातरमला तोडले आणि फक्त अर्धेच गीत गायले जाईल असे केले. आज ज्या काँग्रेससोबत ठाकरे गळ्यात गळे घालून फिरतात, त्यांनाच हा प्रश्न विचारायला हवा. भाजपच्या काळात मात्र वंदे मातरमचा नेहमी सन्मान झाला आहे.’’

  2.  वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि राष्ट्रवादाचा मंत्र आहे. कित्येक क्रांतिकारकांनी फाशी स्वीकारतानाही ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. या महामंत्राने सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढ्याशी जोडले. आज आमच्या विधानसभेतही आम्ही पूर्ण वंदे मातरम गाऊन या गीताला वंदन केले. पुढच्या अधिवेशनात विधानसभेतही यावर चर्चा होईल,’’ असे अध्यक्षांनी जाहीर केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

LOAN WAIVER : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा!

MAHARASHTRA : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'

Two Eclipses In 15 Days : एकाच महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण; ऑगस्ट २०२६ मध्ये दुर्मिळ खगोलीय योग!

मुंबई : वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन मोठ्या खगोलीय घटना ऑगस्ट २०२६ मध्ये

Bihar Hospital Fire : बिहारमधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

बिहार : बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) (ICU) लागलेल्या भीषण

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

'Killer' Film Set Accident : 'किलर' चित्रपटाच्या सेटवर भीषण स्फोट; २६ वर्षीय टेक्निशिअनचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

चेन्नई : ॲक्शन चित्रपटांमधील (Action Films) थरारक दृश्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली तरी त्यामागील मेहनत आणि धोके

Ashadhi Ekadashi Wari : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; ७ जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री संत तुकाराम महाराज