शिवसेनेचे आमदार भाजपत घेऊन काय करू?

मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल; शिवसेना मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे


नागपूर : “शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचे आहे? मित्रपक्षाचे आमदार घेऊन आम्ही असे राजकारण करत नाही. उलट, शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. भविष्यात शिवसेना, भाजप आणि आमची महायुती आणखी मजबूत होताना दिसेल”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांना दिले.


शिउबाठा गटाच्या काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे (शिंदे) २२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘उद्या कोणी असाही दावा करू शकते की उबाठाचे २० आमदार भाजपमध्ये येत आहेत. असले दावे करून काही होत नाही. आम्हाला शिवसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? आम्ही मित्रपक्ष मजबूत करण्यासाठी काम करतो, त्यांना कमकुवत करण्यासाठी नाही.’’


 

‘वंदे मातरम’ला तोडणे हे काँग्रेसचे पाप




  1.  ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हिवाळी अधिवेशनात सोमवारी या गीताचे गायन करण्यात आले. उबाठा गटाने त्यावरूनही राजकारण केले. त्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘वंदे मातरमवर कधीच बंदी नव्हती. जो काही अपमान झाला, त्याला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव मंजूर करून वंदे मातरमला तोडले आणि फक्त अर्धेच गीत गायले जाईल असे केले. आज ज्या काँग्रेससोबत ठाकरे गळ्यात गळे घालून फिरतात, त्यांनाच हा प्रश्न विचारायला हवा. भाजपच्या काळात मात्र वंदे मातरमचा नेहमी सन्मान झाला आहे.’’

  2.  वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि राष्ट्रवादाचा मंत्र आहे. कित्येक क्रांतिकारकांनी फाशी स्वीकारतानाही ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. या महामंत्राने सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढ्याशी जोडले. आज आमच्या विधानसभेतही आम्ही पूर्ण वंदे मातरम गाऊन या गीताला वंदन केले. पुढच्या अधिवेशनात विधानसभेतही यावर चर्चा होईल,’’ असे अध्यक्षांनी जाहीर केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

तिलक वर्मा चमकला, मुंबईने सामना जिंकला; पंजाबचा पाचवा पराभव

धरमशाला : आयपीएल २०२६ मधील ५८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ६ गडी

Shirdi : शिर्डीत ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुल उभारणी

अहिल्यानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ या दूरदर्शी संकल्पनांना चालना

Air India : एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय विमान सेवेत कपात

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे विमानांना लागणाऱ्या इंधनाचा (जेट फ्युएल) तुटवडा निर्माण झाला आहे.

Central Railway : विद्याविहार स्थानकावरील मधल्या पादचारी पुलासाठी विशेष ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेकडून विद्याविहार रेल्वे स्थानक येथे मधल्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम हाती

US China : तैवानकडे वाकड्या नजरेने पाहू नका, जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा

बीजिंग : जगातील दोन महासत्तांचे नेते, डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमधील 'ग्रेट हॉल ऑफ द पीपल' येथे

CNG Price Hike : सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ

मुंबई : मध्य पूर्वेतील तणावामुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटाचा फटका आता मुंबईकरांच्या खिशाला बसला आहे. अमूल आणि मदर