शिवसेनेचे आमदार भाजपत घेऊन काय करू?

मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल; शिवसेना मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे


नागपूर : “शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचे आहे? मित्रपक्षाचे आमदार घेऊन आम्ही असे राजकारण करत नाही. उलट, शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. भविष्यात शिवसेना, भाजप आणि आमची महायुती आणखी मजबूत होताना दिसेल”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांना दिले.


शिउबाठा गटाच्या काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे (शिंदे) २२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘उद्या कोणी असाही दावा करू शकते की उबाठाचे २० आमदार भाजपमध्ये येत आहेत. असले दावे करून काही होत नाही. आम्हाला शिवसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? आम्ही मित्रपक्ष मजबूत करण्यासाठी काम करतो, त्यांना कमकुवत करण्यासाठी नाही.’’


 

‘वंदे मातरम’ला तोडणे हे काँग्रेसचे पाप




  1.  ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हिवाळी अधिवेशनात सोमवारी या गीताचे गायन करण्यात आले. उबाठा गटाने त्यावरूनही राजकारण केले. त्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘वंदे मातरमवर कधीच बंदी नव्हती. जो काही अपमान झाला, त्याला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव मंजूर करून वंदे मातरमला तोडले आणि फक्त अर्धेच गीत गायले जाईल असे केले. आज ज्या काँग्रेससोबत ठाकरे गळ्यात गळे घालून फिरतात, त्यांनाच हा प्रश्न विचारायला हवा. भाजपच्या काळात मात्र वंदे मातरमचा नेहमी सन्मान झाला आहे.’’

  2.  वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि राष्ट्रवादाचा मंत्र आहे. कित्येक क्रांतिकारकांनी फाशी स्वीकारतानाही ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. या महामंत्राने सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढ्याशी जोडले. आज आमच्या विधानसभेतही आम्ही पूर्ण वंदे मातरम गाऊन या गीताला वंदन केले. पुढच्या अधिवेशनात विधानसभेतही यावर चर्चा होईल,’’ असे अध्यक्षांनी जाहीर केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Yamini Jadhav : महापालिका सभागृहात यामिनी जाधव कडाडल्या, मातोश्री दोन कुठल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या काळात बनले

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थापत्य शहर समिती अध्यक्ष यामिनी जाधव यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणा उबाठा आणि

Aarey Stalls : मुंबईतील सर्व आरेचे स्टॉल्स महापालिकेच्या ताब्यात घ्या,

मुंबई : मुंबईत आरेचे उत्पादन बंद आहेत, पण त्यांचे स्टॉल्स सुरु आहेत. आरेच्या दूध वितरणासाठी हे स्टॉल्स देण्यात

BMC News : महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजपा नगरसेविकेने घेतला विरोधकांचा समाचार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी विरोधकांचा चांगलाच

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Assembly Election : बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

पुणे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ पैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन