चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल


मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा नसल्याचा फटका येथील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांना खासगी शाळेची वाट धरावी लागत आहे. मात्र भरमसाठ शुल्क असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता शासकीय शाळेसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
चेंबूर येथील भारतनगर परिसरातील माहुल गाव, गव्हाणपाडा, गडकरी खाण, विष्णूनगर, म्हाडा कॉलनी, अयोध्यानगर, शंकर देऊळ, आणिक गाव, मारवली गाव, रामनगर, कोंकणनगर, चेंबूर कॅम्प परिसरातील एकूण लोकसंख्या सहा ते आठ लाख आहे. भारतनगर, माहुल व अन्य परिसरात एमएमआरडीए वसाहत आणि झोपडपट्टी भागात बहुसंख्य मराठी भाषिक व कामगारवर्ग राहतो. या परिसरात खासगी इंग्रजी शाळा, आंतरराष्ट्रीय शाळा, पालिकेची पब्लिक शाळा आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहेत; परंतु मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे पालकवर्ग, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


पालकांना खासगी शाळेचे भरमसाठ शुल्क भरणे परवडत नाही. त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर दूर असलेल्या चेंबूर नाका येथील पालिकेच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळेचा आधार घ्यावा लागत आहे. या त्रासामुळे काही विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाला रामराम ठोकला आहे.


पालिका, एमएमआरडीए प्रशासन माहुल, वाशी नाका परिसरातील इमारतीत प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनर्वसन करते. मात्र लोकसंख्येनुसार कोणतीही सुविधा देत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी केली जात आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या परिसरात माध्यमिक शाळा सुरू करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू

Water Metro: मुंबईच्या समुद्रात ८ मार्गांवर धावणार 'वॉटर मेट्रो' - मंत्री नितेश राणे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्गिका सुरू होणार मुंबई : मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी

Emmanuel Macron India Visit: पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात

मुंबई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला

Harshvardhan Sapkal : मी तुलना केलीच नव्हती मात्र...अखेर शिवरायांच्या अपमानावरून हर्षवर्धन सपकाळांची माफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या धाडसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची

२०३० पर्यंत राज्यात ५० टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; देशातील पहिल्या 'क्लायमेट वीक'चे मुंबईत उद्घाटन

मुंबई : "राज्यात सध्या अक्षय ऊर्जेची क्षमता झपाट्याने वाढवली जात असून, २०३० पर्यंत एकूण वीज निर्मितीत हरित

अल्पसंख्याक प्रमाणपत्र घोटाळ्यात मंत्रालयातील उपसचिव रडारवर - अनियमितता करणाऱ्यांची गय नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले कठोर कारवाईचे संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असताना, मंत्रालयातील अल्पसंख्याक