२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती


नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार केले. यात जानेवारी २०२५ पासून हद्दपार केलेल्या ३,२५८ भारतीयांचा समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले.


पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, मानवी तस्करीच्या प्रकरणांची चौकशी राज्यांनी तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केली आहे. यात पंजाबमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. २०२३ मध्ये ६१७ भारतीयांना आणि २०२४ मध्ये १,३६८ भारतीयांना हद्दपार करण्यात आले, असे मंत्र्यांनी सांगितले. जानेवारी २०२५ पासून अमेरिकेने एकूण ३,२५८ भारतीय नागरिकांना हद्दपार केले आहे. यापैकी २,०३२ भारतीय (अंदाजे ६२.३ टक्के) नियमित व्यावसायिक उड्डाणांनी परतले आणि उर्वरित १,२२६ भारतीय (३७.६ टक्के) यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) किंवा कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी)द्वारे चालवल्या जाणाऱ्या चार्टर विमानांनी परतले,
असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या