उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोण होणार होते मुख्यमंत्री ? नितेश राणेंनी केला गौप्यस्फोट

पिंपरी : ‘विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना आयुष्यात कधीच मुख्यमंत्री करणार नव्हते आणि हे एकनाथ शिंदे यांनाही माहिती होते. उद्धव ठाकरे यांच्यानंतर रश्मी ठाकरे नंतर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे ठरले होते; असा गौप्यस्फोट मंत्री नितेश राणे यांनी केला.


चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप आणि ॲड. देवराज डहाळे यावेळी उपस्थित होते.


भाजप अॅनाकोंडा आहे. तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गिळंकृत करेल या उद्धव ठाकरे यांच्या आरोपाबाबत विचारले असता मच्छरानं असं दुसऱ्याला बोलू नये, असे नितेश राणे म्हणाले. शिउबाठा ही काँग्रेसची ढ टीम असल्याचेही नितेश राणे म्हणाले.


उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये बेईमानी करून काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना आयुष्यात कधीच मुख्यमंत्री बनवणार नव्हते, हे शिंदे यांनाही माहिती होते. उद्धव ठाकरे यांच्यानंतर रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे ठरले होते. त्यामुळे भाजपने काय केले हे शिंदे यांना माहिती होते. तब्बल १०५ आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. उद्धव ठाकरे यांनी जो मान दिला नाही, तो भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला’ असे मंत्री नितेश राणे म्हणाले.


कोणत्याही देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण होत असेल लँड जिहादचा प्रयत्न सुरू असेल तर खपवून घेणार नाही. यासाठी आवश्यक ती काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश मंत्री नितेश राणेंनी दिले.


लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वातावरणात महाराष्ट्रातल्या हिंदूंनी हिंदुत्ववादी महायुती सरकार निवडून दिल्याचंही मंत्री नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

पुण्यात पोलीस हवालदारानं मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल

पुणे : 'तुझा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो, वरिष्ठ मला त्रास देतात. यामुळे

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

सायबर भामट्यांकडून ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाची १.२५ कोटीची फसवणूक

मुंबई: ठाणे पश्चिम एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर गुन्हेगारांनी १.२५ कोटीची फसवणूक केली आहे. डेटा

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास