उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास संकट निर्माण झाले आहे. शेकडो उड्डाणं रद्द झाल्याने हजारो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. देशाच्या हवाई सेवांमध्ये इंडिगोचा सुमारे ६५ टक्के हिस्सा असल्याने या विस्कळीतपणाचा सर्वाधिक फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.


उड्डाणं रद्द झाल्यानंतर अनेक प्रवासी इतर कंपन्यांकडे वळू लागले. याच पार्श्वभूमीवर काही एअरलाईन्सनी तिकीट दर वाढवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप आणखी वाढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून नागरी उड्डाण मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


मंत्रालयाने हवाई वाहतूक विस्कळीत झालेल्या सर्व मार्गांवर ‘फेअर कॅप’ लागू केला आहे. या निर्णयामुळे कोणत्याही एअरलाईनला ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त तिकीट दर आकारता येणार नाहीत. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिगोच्या नव्या ऑपरेशनल नियमांची पुरेशी तयारी न झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक उड्डाणं रद्द झाली, तर बरीच उड्डाणं विलंबाने निघाली. या स्थितीत इतर कंपन्यांकडे प्रवासी वाढले आणि काही मार्गांवरील तिकिटांचे दर अचानक वाढले. याची गंभीर दखल घेत मंत्रालयाने नियामक अधिकारांचा वापर करत कमाल तिकीट मर्यादा निश्चित केली आहे.


मंत्रालयाने सर्व कंपन्यांना अधिकृत आदेश पाठवले असून, परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत हा फेअर कॅप लागू राहणार आहे. कोणत्याही एअरलाईनला या नियमाविरुद्ध तिकीट विक्री करण्यास परवानगी नसेल, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेप नवी दिल्ली : जीएसटी कमी