उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास संकट निर्माण झाले आहे. शेकडो उड्डाणं रद्द झाल्याने हजारो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. देशाच्या हवाई सेवांमध्ये इंडिगोचा सुमारे ६५ टक्के हिस्सा असल्याने या विस्कळीतपणाचा सर्वाधिक फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.


उड्डाणं रद्द झाल्यानंतर अनेक प्रवासी इतर कंपन्यांकडे वळू लागले. याच पार्श्वभूमीवर काही एअरलाईन्सनी तिकीट दर वाढवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप आणखी वाढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून नागरी उड्डाण मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


मंत्रालयाने हवाई वाहतूक विस्कळीत झालेल्या सर्व मार्गांवर ‘फेअर कॅप’ लागू केला आहे. या निर्णयामुळे कोणत्याही एअरलाईनला ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त तिकीट दर आकारता येणार नाहीत. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिगोच्या नव्या ऑपरेशनल नियमांची पुरेशी तयारी न झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक उड्डाणं रद्द झाली, तर बरीच उड्डाणं विलंबाने निघाली. या स्थितीत इतर कंपन्यांकडे प्रवासी वाढले आणि काही मार्गांवरील तिकिटांचे दर अचानक वाढले. याची गंभीर दखल घेत मंत्रालयाने नियामक अधिकारांचा वापर करत कमाल तिकीट मर्यादा निश्चित केली आहे.


मंत्रालयाने सर्व कंपन्यांना अधिकृत आदेश पाठवले असून, परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत हा फेअर कॅप लागू राहणार आहे. कोणत्याही एअरलाईनला या नियमाविरुद्ध तिकीट विक्री करण्यास परवानगी नसेल, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत