तज्ज्ञांकडून आरबीआयच्या पावलाचे स्वागत- एचएसबीसी ग्लोबल रिसर्च इन्व्हेसमेंटचा अहवालातून दुजोरा

मुंबई: एचएसबीसी ग्लोबल रिसर्च इन्व्हेसमेंटने दिलेल्या अहवालानुसार, वित्तीय पतधोरण समितीने जाहीर केलेल्या व्याजदर कपातीच्या तज्ज्ञांकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आल्याचे आपल्या अहवालात नमूद केले. काल तीन दिवसीय वित्तीय पतधोरण समितीची बैठक पार पडली ज्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी २५ बेसिस पूर्णांकाने कपात घोषित केली. त्यामुळे ५.५०% वरून ५.२५% रेपो दर झाल्याने मोठ्या प्रमाणात कपातीचा फायदा ग्राहक केंद्रित बाजारात जाणवू शकतो. प्रामुख्याने कर्जाच्या मागणीत व पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याने बाजारातील तरलता (Liquidity) बाजारात मोठ्या प्रमाणात वाढू शकते.तज्ञांच्या मते यामुळे क्रेडिट वाढ अपेक्षित आहे. याविषयी बोलताना अहवालात हे देखील स्पष्ट आहे की यामुळे बाजारात १.४५ लाख ट्रिलियन रूपयांची तरलता वाढू शकते. त्यांनी आपल्या अहवालात उल्लेख केल्याप्रमाणे,'आरबीआयने २५ बेसिस पॉइंट्स रेपो दरात कपात केल्याने त्यांच्या कडक भूमिकेमुळे आर्थिक वर्ष २७ मध्ये वाढ कमकुवत झाल्यास आणखी सवलती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर परकीय चलनातील घसरणीमुळे निर्यात स्पर्धात्मकता सुधारू शकते असे एका अहवालात म्हटले आहे.


आरबीआयने बाजारात अतिरिक्त तरलता वाढवण्यासाठी १ ट्रिलियन रुपयांच्या ओपन मार्केट ऑपरेशन्स खरेदी आणि ३ वर्षांच्या डॉलर- रुपये व ५ अब्ज डॉलर्सच्या खरेदी-विक्री स्वॅपच्या योजना जाहीर केल्या होत्या. यावर एचएसबीसीने म्हटले आहे की त्यांचे महागाईचे अंदाज आरबीआयच्या तुलनेत सुमारे ५० बेसिस पॉइंट्स कमी आहेत. आर्थिक वर्ष २७ मधील पहिल्या तिमाहीत (H1FY27) कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आम्हाला वाटते की सध्या वाढ मजबूत आहे, परंतु वित्तीय कडकपणा, कमकुवत निर्यात आणि जीएसटी वाढीतील घट यामुळे मार्च तिमाहीपर्यंत ती मंदावेल. आर्थिक असहिष्णुतेच्या जगात वित्तीय धोरण कडक राहील आणि वाढीला आधार देण्याची जबाबदारी आरबीआयवर येईल असे अहवालात म्हटले आहे.


आरबीआयने महागाईचा अंदाज कमी केला, वाढ कमी होऊ शकणाऱ्या क्षेत्रांवर चर्चा केली आणि पुरेशी तरलता सुनिश्चित केली असे अहवालात म्हटले आहे. केंद्रीय बँकेचे धोरण कमकुवत होते कारण त्यांनी आर्थिक वर्ष २६ आणि आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या सहामाहीसाठी चलनवाढीचा अंदाज अनुक्रमे ६० बीपीएस आणि ५० बीपीएसने कमी केला आणि आर्थिक वर्ष २६ साठी जीडीपीचा अंदाज ७.३% वाढवला आहे. 'तरलतेबाबत बोलताना डिसेंबरमध्ये आरबीआय १.४५ ट्रिलियन रुपयांचा निधी देत आहेच असे गव्हर्नरने नमूद केले आहे. गरज पडल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो' असे अहवालात नमूद केले आहे.अर्थव्यवस्थे च्या वाढीला चालना देण्यासाठी आरबीआय एमपीसी सदस्यांनी एकमताने रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.२५% करण्याचा निर्णय घेतला. विश्लेषकांनी सांगितले की, रेपो दर कमी करण्याचा आरबीआयचा निर्णय हा कमी चलनवाढीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक जागेचा वापर करून वापराला चालना देण्यासाठी आणि विकास चक्राला बळकटी देण्यासाठी केला जात आहे.

Comments
Add Comment

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

US-Iran War : अमेरिकेचा इराणवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ला; बहरीन-कुवेतमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन, मध्य-पूर्वेत युद्धजन्य तणाव

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका व्यापारी तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर मध्य-पूर्वेतील तणाव