जिल्ह्यात ४५४ बालके कुपोषित

उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव


अलिबाग : महिला व बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील ४५४ कुपोषित बालके आढळून आली आहेत, ज्यात ६१ तीव्र, तर ३९३ मध्यम कुपोषित बालकांचा समावेश आहे. आदिवासी बहुल भागात कुपोषणाचे प्रमाण अजुनही अधिक असल्याचे दिसून येते. शासनाकडून कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही.


महिला व बालकल्याण विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील १६ प्रकल्पांतील ३ हजार १६१ अंगणवाड्यांचे, तसेच मिनी अंगणवाड्यातील मुलांचे सर्वेक्षण केले. यापैकी ९८ हजार ७८० मुलांचे वजन घेण्यात आले. या सर्वेक्षणात तीव्र कुपोषित श्रेणीतील ६१ बालके, सौम्य कुपोषित श्रेणीतील ३९३ बालके आढळली. कर्जत, रोहा, माणगाव, पोलादपूर, पेण, महाड या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण


अधिक आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महिला बालकल्याण विभागाने ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली. या योजनेनुसार कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जातो आहे. मात्र, तरीही कुपोषणाचे प्रमाण घटलेले नाही. या समाजात होणारे बालविवाह, बेरोजगारी, आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर, त्यामुळे मुलांची होणारी आबाळ ही कुपोषणाची मागची कारणे आहेत.


कुपोषित बालकाचे नियमित सर्वेक्षण केले जाते. कुपोषित आढळणाऱ्या बालकांना पोषण आहार दिला जात आहे. तीव्र कुपोषित बालकांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यामुळे सॅम १५, तर मॅम श्रेणीतील १०१ बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. -निर्मला कुचिक, (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग)

Comments
Add Comment

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

पनवेल : आई आणि तीच मूल मग मुलगा असो वा मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. आपलं

धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पास्थळ महोत्सव २०२५

'जाणता राजा फाऊंडेशन'चा २७-२८ डिसेंबरला महोत्सव पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा