जिल्ह्यात ४५४ बालके कुपोषित

उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव


अलिबाग : महिला व बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील ४५४ कुपोषित बालके आढळून आली आहेत, ज्यात ६१ तीव्र, तर ३९३ मध्यम कुपोषित बालकांचा समावेश आहे. आदिवासी बहुल भागात कुपोषणाचे प्रमाण अजुनही अधिक असल्याचे दिसून येते. शासनाकडून कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही.


महिला व बालकल्याण विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील १६ प्रकल्पांतील ३ हजार १६१ अंगणवाड्यांचे, तसेच मिनी अंगणवाड्यातील मुलांचे सर्वेक्षण केले. यापैकी ९८ हजार ७८० मुलांचे वजन घेण्यात आले. या सर्वेक्षणात तीव्र कुपोषित श्रेणीतील ६१ बालके, सौम्य कुपोषित श्रेणीतील ३९३ बालके आढळली. कर्जत, रोहा, माणगाव, पोलादपूर, पेण, महाड या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण


अधिक आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महिला बालकल्याण विभागाने ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली. या योजनेनुसार कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जातो आहे. मात्र, तरीही कुपोषणाचे प्रमाण घटलेले नाही. या समाजात होणारे बालविवाह, बेरोजगारी, आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर, त्यामुळे मुलांची होणारी आबाळ ही कुपोषणाची मागची कारणे आहेत.


कुपोषित बालकाचे नियमित सर्वेक्षण केले जाते. कुपोषित आढळणाऱ्या बालकांना पोषण आहार दिला जात आहे. तीव्र कुपोषित बालकांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यामुळे सॅम १५, तर मॅम श्रेणीतील १०१ बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. -निर्मला कुचिक, (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग)

Comments
Add Comment

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

शैक्षणिक सहली, लग्नसमारंभांसाठी 'लालपरी' सुसाट

खासगी वाहनांपेक्षा एसटीतून होणार पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास स्वप्नील पाटील पेण : नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या

मुलुंड कचराभूमीतील कचरा विल्हेवाट प्रकल्पाला फेब्रुवारी २०२६ची मुदत

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ६८ टक्के काम पूर्ण मुंबई : मुलुंड कचराभूमीतील कचऱ्याच्या डोंगरांची शास्त्रीय

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधी मैत्री

निवडणुकीच्या कामाला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भांतील विविध कामे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतली आहेत.

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९