चौलच्या पर्वतवासी श्री दत्तात्रेय देवस्थानच्या यात्रेला सुरुवात

सोमवारी, ८ डिसेंबरला पाच दिवसाच्या यात्रेचा होणार समारोप


अलिबाग : चौलच्या पर्वतवासी श्रीदत्तात्रेय देवस्थानच्या पाचदिवसीय यात्रेला श्री दत्तजयंतीपासून ४ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, या यात्रेसाठी रायगडसह मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी भागातून भाविक येण्याची शक्यता असल्याने या पाचदिवसीय यात्रेत लाखोंची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी ८ डिसेंबरला या पाचदिवसीय यात्रेचा समारोप होणार आहे.


इतिहास काळात विदेश व्यापारांशी संलग्न असलेल्या चौल चंपावती नगरीत प्रसिद्ध अशी ३६० मंदिरांची नोंद सापडते. चौल रामेश्वर, चौल शितळादेवी, हिंगुळजा देवी, मुखरी गणपती, महालक्ष्मी, चंपावतीदेवी, चौल कुंडेश्वर मंदिर, रेवदंडा हरेश्वर मंदिर, रेवदंडा मारूती मंदिर आदी मंदिरे अद्यापी इतिहासाची साक्षीदार आहेत, त्यापैकीच चौलचे भोवाळे येथील पर्वतवासी श्रीदत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान होय. चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.


या यात्रेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे या भागांतून असंख्य भाविक यात्रेच्या पाच दिवसात उपस्थिती लावत श्रीदत्तात्रेयाचे दर्शन घेण्याबरोबरच यात्रेचा मनमुराद आनंद लुटत असतात. या वर्षातील ही अलिबाग तालुक्यातील शेवटची यात्रा असून, हा दत्त नवसाला पावतो व त्याच्या दर्शनाने भाविकांच्या अडीअडचणीचे निवारण होते अशी लोकांची श्रध्दा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी नगरीतील पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजापैकी मुंबईत राहणाऱ्या मंडळीनी सुमारे ४० ते ६० वर्षापूर्वी तयार केलेला चांदीचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजतगाजत श्रीदत्त मंदिरात आणला जातो. मुळ दत्तमूर्तीची यथासांग पुजा करून हा मुखवटा मुळ दत्तमूर्तीला लावला जातो. यात्रेपूर्वी श्रीदत्त मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो.


हे मंदिर पुरातन नसले तरी ऐतिहासिक निश्चितच आहे. कारण आग्रेंच्या उत्तरकालीन इतिहासात या दत्तमंदिराचा उल्लेख वरचेवर आढळतो, तसेच आंग्रे घराण्यातील पुरूषांची या पर्वतवासी दत्तावर अतिशय श्रध्दा होती असे समजले.


चौलला येण्यासाठी खासगी वाहनाने वडखळ, पोयनाड, अलिबाग, नागावमार्गे चौलला येता येते. एसटीने आल्यास बोरिवली-रेवदंडा या एसटीने किंवा गेटवे ऑफ इंडिया येथून पीएनपी, अंजठा, पीएनपीने लॉचने मांडवा (अलिबाग) आल्यानंतर त्यांच्या खासगी बसने अलिबागला आल्यानंतर अलिबाग-रेवदंडा एसटीने, तसेच खासगी रिक्षाने चौल नाका येथे उतरून यात्रेच्या ठिकाणी पायी जाता येते. चौलमध्ये राहावयाचे झाल्यास या परिसरात लॉजिंग-बोर्डीगची सोय आहे. उपहारगृहेही आहेत.

Comments
Add Comment

करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीमधून जान्हवी कपूरची एक्झिट, करण म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकताच करण जोहरच्या 'धर्मा' टॅलेंट एजन्सीमधून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्री

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

हॅरियर.इव्हीचे नवीन फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५ मॉडेल

मुंबई : टाटा.इव्ही, भारतातील सर्वात मोठी फोर-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, यांनी हॅरियर.इव्ही या संपूर्ण

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; आता 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक असलेली कलर्स मराठीवरील

एकेकाळी रणवीरवर नाराज असणाऱ्या 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याने आता केले रणवीरचे तोंडभरून कौतुक; म्हणाला ....

काही दिवसांपूर्वी रणवीरने दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमातील भूमिकेची नक्कल केली होती.

Dhurandhar 2 : धुरंधर २ खरचं ठरला धुरंधर, बॉक्सऑफिसवर ओलांडला ५०० कोटींचा टप्पा

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ ने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला असून या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड