१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती


मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली. गडकरी यांनी सांगितले की, देशातील सध्याची टोल वसुली प्रणाली एका वर्षाच्या आत पूर्णपणे बंद केली जाईल आणि त्याऐवजी नवी इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली लागू करण्यात येईल. या नवीन प्रणालीमुळे महामार्गावर वाहने न थांबता, विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.


नितीन गडकरी म्हटले की, हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे देशभरातील टोल प्लाझा अदृश्य होतील आणि वाहने टोल भरण्यासाठी न थांबता वेगात पुढे जाऊ शकतील. यामुळे टोलवरील लांब रांगा आणि वेळेची बचत होईल.


सध्याच्या फास्टॅग तंत्रज्ञानावर आधारित ही नवी प्रणाली राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) अंतर्गत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे. यात आरएफआयडी आधारित फास्टॅग उपकरण वाहनाच्या विंडस्क्रीनवर (समोरच्या काचेवर) लावले जाते. वाहन टोल प्लाझातून जाताना, हे उपकरण थेट चालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापते. यामुळे रोख व्यवहार किंवा थांबण्याची आवश्यकता भासत नाही. सध्या ही नवीन प्रणाली देशभरातील सुमारे १० ठिकाणी चाचणी आणि देखरेखीसाठी लागू करण्यात आली आहे. पुढील एका वर्षात ती संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर लागू होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना