मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट! नेरूळ-उरण-बेलापूर पट्ट्यात अतिरिक्त लोकल सेवा लवकरच होणार सुरू

नवी मुंबई: नेरूळ उरण रेल्वेमार्गावर उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ व्हावी म्हणून मागील अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. या मागणीवर अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नेरुळ-उरण-नेरुळ आणि बेलापूर-उरण-बेलापूर या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले आहे. त्यामुळे आता नेरुळ-उरण मार्गावर ४ फेऱ्या तर बेलापूर-उरण मार्गावर ६ फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या उपनगरीय सेवांमध्ये तारघर आणि गव्हाणे स्थानकाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहेत.





मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या नेरूळ ते खारकोपर रेल्वेसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर उरणकरांना सुद्धा उपनगरीय रेल्वे सेवेची प्रतीक्षा होती. उरण रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी स्थानक उभरणीपासून सुरुवात असतानासुद्धा अनेक अडथळ्यांनंतर अखेर उरण रेल्वे सेवा सुरू झाली. ज्याचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र उरण रेल्वे अंतर्गत येणाऱ्या स्थानकांची कामे प्रलंबित असल्यामुळे रेल्वे सेवा सुरू झाली नव्हती.




महत्त्वाचे म्हणजे उरण भागातून बहुतेक चाकरमानी मुंबई, नवी मुंबईमध्ये कामानिमित्त ये-जा करतात. तसेच अनेक विद्यार्थी मुंबई, पनवेल, नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येतात. मात्र स्थानकांची कामं अपूर्ण असल्यामुळे त्यांना खासगी वाहनांनी मुंबई, नवी मुंबईकडे प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता केंद्र सरकारने दाखवलेल्या हिरव्या कंदीलामुळे लवकरच उरण उपनगरीय सेवा सुरू होणार आहे. ज्यामध्ये तारघर आणि गव्हाण या स्थानकांनाही मंजूरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होणार असून नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास