मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट! नेरूळ-उरण-बेलापूर पट्ट्यात अतिरिक्त लोकल सेवा लवकरच होणार सुरू

नवी मुंबई: नेरूळ उरण रेल्वेमार्गावर उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ व्हावी म्हणून मागील अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. या मागणीवर अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नेरुळ-उरण-नेरुळ आणि बेलापूर-उरण-बेलापूर या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले आहे. त्यामुळे आता नेरुळ-उरण मार्गावर ४ फेऱ्या तर बेलापूर-उरण मार्गावर ६ फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या उपनगरीय सेवांमध्ये तारघर आणि गव्हाणे स्थानकाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहेत.





मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या नेरूळ ते खारकोपर रेल्वेसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर उरणकरांना सुद्धा उपनगरीय रेल्वे सेवेची प्रतीक्षा होती. उरण रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी स्थानक उभरणीपासून सुरुवात असतानासुद्धा अनेक अडथळ्यांनंतर अखेर उरण रेल्वे सेवा सुरू झाली. ज्याचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र उरण रेल्वे अंतर्गत येणाऱ्या स्थानकांची कामे प्रलंबित असल्यामुळे रेल्वे सेवा सुरू झाली नव्हती.




महत्त्वाचे म्हणजे उरण भागातून बहुतेक चाकरमानी मुंबई, नवी मुंबईमध्ये कामानिमित्त ये-जा करतात. तसेच अनेक विद्यार्थी मुंबई, पनवेल, नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येतात. मात्र स्थानकांची कामं अपूर्ण असल्यामुळे त्यांना खासगी वाहनांनी मुंबई, नवी मुंबईकडे प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता केंद्र सरकारने दाखवलेल्या हिरव्या कंदीलामुळे लवकरच उरण उपनगरीय सेवा सुरू होणार आहे. ज्यामध्ये तारघर आणि गव्हाण या स्थानकांनाही मंजूरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होणार असून नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा