इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंडिगोच्या शेकडो उड्डाणांना रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. इंडिगोच्या या बेफिकीर कामामुळे बरेच प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडले.


इंडिगोचे एक विमान नागपूरहुन पुण्याला जाणार होते. पण ते पुण्याला न पोहोचता थेट हैदराबादला गेले. विमान हैदराबादला पोहोचलं, तेव्हा तिथे देखील त्यांना तब्बल एक तास विमानाच्या बाहेर येऊच दिलं नाही, झालेल्या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी विमानातच गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रवाशांनी विमानात गोंधळ सुरू केल्यामुळे अखेर या प्रवाशांना विमानातून बाहेर सोडण्यात आलं, नागपुरहून पुण्याला निघालेले अनेक प्रवासी अजूनही हैदरबाद विमानतळावरच अडकून पडले आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार नागपूरमधील प्रवाशांना इंडिगोच्या विमानाने पुण्याला जायचे होते. मात्र इंडिगोने गुरुवारी प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी नागपूर – पुणे अशी इंडिगोची फ्लाईट नियोजित होती. मात्र ती फ्लाईट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नाही, त्यानंतर रात्री एक वाजता फ्लाईटने उड्डाण घेतले. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगोच्या पायलटने आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड केलं.


हे विमान हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही. अखेरीस काही प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना हैदराबाद टर्मिनल्सवर विमानातून बाहेर सोडण्यात आले. अजूनही नागपूरचे अनेक प्रवासी जे पुण्याला जायला निघाले होते, ते हैदराबादमध्येच अडकून पडले आहेत. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाराणसीवरून पुण्याला जाण्यासाठी निघालेले देखील अनेक प्रवासी सध्या हैदराबादमध्ये अडकून पडले आहेत. हैदराबाद विमानतळावर प्रचंड हाल होत असल्याची तक्रार या प्रवाशांनी केली आहे.

Comments
Add Comment

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)