महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना


एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत


निम्मे शेक्षणिक वर्ष निघून गेल्यानंतर प्रशासनाने घेतला निर्णय


मुंबई (सचिन धानजी) - निम्म शेक्षणिक वर्ष उलटून गेल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शालेय विभागाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहाराअंतर्गत अतिरिक्त एनर्जी बार देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका शाळांमधील मुलांना पोषण आहाराअंतर्गत खिचडीचे वाटप होत असले तरी त्यांना सकस आहार मिळावा आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा म्हणून एनर्जी बार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा एनर्जी बार देण्यासाठी १४१कोटी रुपये खर्च केले जाणार असून हा एजर्नी बार मुलांसाठी पोषक ठरणार आहे की कंत्राटदारांसाठी पोषक ठरणार आहे हे येत्या दिवसांतच स्पष्ट होईल.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सुदृढ आरोग्य रहावे, वयोगटानुसार विद्यार्थ्यांचा शारीरिक विकाम व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. तसेच, आता मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधील सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा व त्यांचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाच्यावतीने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील बालवाडी ते इयत्ता वीच्या विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहाराचा अर्थात सप्लीमेंटरी न्युट्रीशन एनर्जी बार चाही पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक बालवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ५० ग्रॅम्सचा हा एनर्जी बार उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरदिवशी ३ लाख ५२ हजार ८२१ विद्यार्थ्यांना पुरवठा केला जाणार आहे.


यासाठी निविदा सप्टेंबर महिन्यांत मागवण्यात आली होती, परंतु याची निविदा नोव्हेंबर महिन्यांत पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी पाच कंपन्यांनी भाग घेतला होता आणि त्यातील तीन कंपन्या यासाठी पात्र ठरल्या होत्या. त्यातील गुणिना कमर्शिअल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी १ ४१ कोटी ०७ लाख १९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. सुट्या वगळता १२० दिवसांकरता या एनर्जी बारचा पुरवठा केला जाणार असला तरी प्रत्यक्षात एक वर्षांची मंजुरी मागण्यात आली आहे.

Comments
Add Comment

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत

BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे