मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची निवडणूक संचालन समिती जाहीर

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. ज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून मतमोजणी बाकी आहे. तर इतर दोन टप्प्यातील निवडणूकीसाठी सर्व पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने मोठी घोषणा केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ करिता भारतीय जनता पक्षाची मुंबई निवडणूक संचालन समिती घोषित केली आहे.


अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आलेल्या निवडणूक संचालन समितीमध्ये पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ज्यात आशिष शेलार, अॅड. मंगलप्रभात लोढा, अॅड. राहुल नार्वेकर, प्रकाश मेहता, किरीट सोमैय्या, कालिदास कोळंबकर, मिहिर कोटेचा, पराग शाह, राम कदम, प्रसाद लाड, चित्रा वाघ या महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून एकूण १४४ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.



दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या मुंबई निवडणूक संचालन समितीमधील निमंत्रितांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :

EL Nino effects to Kharif : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे सावट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता मुंबई : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे

मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची घोषणा; बिझनेस फोरममध्ये भारत-सायप्रस दरम्यान सहा सामंजस्य

Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा

कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियामध्ये करार

राज्यातील युवकांना मिळणार जागतिक दर्जाच्या संधी; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्र्यातील दगडफेक प्रकरण तापलं! गरिब नगरमधून १६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील गरिब नगर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ जणांना