Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राजकारण सुरू आहे. ११५० एकरांवर साधूग्रामसाठी १८०० झाडे तोडण्याच्या योजनेवर तथाकथित पर्यावरणवादी आणि राजकीय नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मात्र धैर्य दाखवून एक खडा आणि तिखट प्रश्न विचारत विरोधकांचा ढोंगीपणा उघड केला आहे. मंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'एक्स' (X) सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करत पर्यावरणवाद्यांच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी तोच ज्वलंत प्रश्न उपस्थित केला आहे, जो सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. राणे यांनी म्हटले आहे की, "तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव?"





राणे यांच्या या वक्तव्याने स्पष्ट केले आहे की, विरोधकांचा हा विरोध पर्यावरणापेक्षा अधिक राजकीय हेतूने प्रेरित आहे. जेव्हा एखादा धर्म आणि त्याची श्रद्धा येते, तेव्हा गप्प बसणारे हे 'पर्यावरणवादी' हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या आडकाठी आणत आहेत. नितेश राणे यांनी 'सर्व धर्म समभाव'ची व्याख्या केवळ सोयीनुसार वापरणाऱ्यांना आव्हान दिले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असताना, मंत्री नितेश राणे यांच्या या सत्यशोधक वक्तव्यामुळे विरोधकांना आता आपल्या भूमिकेवर विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या या प्रश्नावर विरोधकांकडून आता कोणती प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी