Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राजकारण सुरू आहे. ११५० एकरांवर साधूग्रामसाठी १८०० झाडे तोडण्याच्या योजनेवर तथाकथित पर्यावरणवादी आणि राजकीय नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मात्र धैर्य दाखवून एक खडा आणि तिखट प्रश्न विचारत विरोधकांचा ढोंगीपणा उघड केला आहे. मंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'एक्स' (X) सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करत पर्यावरणवाद्यांच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी तोच ज्वलंत प्रश्न उपस्थित केला आहे, जो सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. राणे यांनी म्हटले आहे की, "तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव?"





राणे यांच्या या वक्तव्याने स्पष्ट केले आहे की, विरोधकांचा हा विरोध पर्यावरणापेक्षा अधिक राजकीय हेतूने प्रेरित आहे. जेव्हा एखादा धर्म आणि त्याची श्रद्धा येते, तेव्हा गप्प बसणारे हे 'पर्यावरणवादी' हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या आडकाठी आणत आहेत. नितेश राणे यांनी 'सर्व धर्म समभाव'ची व्याख्या केवळ सोयीनुसार वापरणाऱ्यांना आव्हान दिले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असताना, मंत्री नितेश राणे यांच्या या सत्यशोधक वक्तव्यामुळे विरोधकांना आता आपल्या भूमिकेवर विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या या प्रश्नावर विरोधकांकडून आता कोणती प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण

Railway News : मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता 'ओटीपी' बंधनकारक; रेल्वेचा नवीन नियम काय?

मुंबई : रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने एक