वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असतानाच बुधवारी चार माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वसई-विरारच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने वसई - विरारमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली असून महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी महापालिकेवर सलग दोन टर्म सत्ता गाजविलेल्या बहुजन विकास आघाडीला फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आधी बविआ नेते नितीन ठाकूर, माजी नगरसेवक दिनेश भानुशाली, माजी नगरसेवक महेश पाटील, प्रदीप पवार यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपने आपल्याकडे खेचल्यानंतर आणखीन चार माजी नगरसेवकांनी बुधवारी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.


बविआ माजी सभापती माया चौधरी, माजी नगरसेवक राजेश ढगे, सुषमा दिवेकर, ज्योती राऊत तसेच परिवहन सभापती कल्पक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबई येथील भाजपा कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी नालासोपारा आमदार राजन नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, मनोज बारोट उपस्थित होते.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .