'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या फेरीसाठी पाच हजार ५५३ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी तीन हजार १९१ विद्यार्थी प्राधान्यक्रम व्यवस्थित भरलेच नसल्यामुळे अपात्र झाले. हे विद्यार्थी पहिल्याच फेरीतून बाहेर फेकले गेले. पहिल्या फेरीमध्ये बाद होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ५७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. उर्वरित दोन हजार ३६२ जणांपैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी वैद्यकशास्त्र, भूलशास्त्र आणि शल्यचिकित्साशास्त्र या विषयांना प्राधान्य दिले आहे.


राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबवली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत पाच हजार ५५३ जणांपैकी फक्त दोन हजार ३६२ जण पात्र ठरले.


प्राधान्यक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी २६३ विद्यार्थ्यांनी वैद्यकशास्त्र, २४० विद्यार्थ्यांनी भूलशास्त्र तर २३० विद्यार्थ्यांनी शल्यचिकित्साशास्त्र शाखांची निवड केली आहे. स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र या शाखेसाठी १९० विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. तसेच रेडिओलॉजी शास्त्राला १२३ विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. शरीरशास्त्र आणि रक्तविज्ञान या विषयांना विद्यार्थ्यांनी सर्वात कमी प्रतिसाद दिला आहे. प्राधान्यक्रम न भरल्याने पहिल्या फेरीसाठी पात्र न ठरलेले विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी नव्याने अर्ज करू शकतील. यावेळी प्राधान्यक्रमांसह अर्ज व्यवस्थित भरल्यास या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेसाठी विचार होणार आहे.


देशात रेडिओलॉजी विषयाला विद्यार्थी पसंती देत असताना महाराष्ट्रात मात्र विद्यार्थ्यांचा वैद्यकशास्त्राकडे अधिक कल आहे. राज्यामध्ये रेडिओलॉजी हा विषय नवव्या क्रमांकावर आहे. तसेच देशभरात फक्त ६ टक्के विद्यार्थ्यांनी शल्यचिकित्साशास्त्र शाखेची निवड केली असताना राज्यातील प्रवेशांमध्ये हे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.