Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे बदलल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव बदलले आहे. यापुढे मलबार हिल येथील ऐतिहासिक ‘राजभवन’ हे ‘लोकभवन’ या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली असून, ती तत्काळ प्रभावाने लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



“महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव यापुढे ‘राजभवन’ ऐवजी ‘लोकभवन’ असे असेल”, असे अधिसूचनेत म्हटले आहे. हा बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘राजभवन’ हे नाव ब्रिटिश राजवटीपासून चालत आलेले असून, स्वातंत्र्यानंतरही देशातील बहुतांश राज्यांमध्ये राज्यपालांचे निवासस्थान ‘राजभवन’ या नावानेच ओळखले जाते. मात्र आता ‘राज’ हा शब्द हटवून ‘लोक’ हा शब्द वापरण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “राजेशाही खुणा पुसून टाकण्याचा आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने जनभावनेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. ‘लोकभवन’ हे नाव सर्वसमावेशक आहे”, असे त्यांना सांगितले. पुढील काही दिवसांत सर्व अधिकृत पत्रव्यवहार, नामफलक आणि आणि संकेतस्थळावरही हा बदल केला जाणार आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी