Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे बदलल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव बदलले आहे. यापुढे मलबार हिल येथील ऐतिहासिक ‘राजभवन’ हे ‘लोकभवन’ या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली असून, ती तत्काळ प्रभावाने लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



“महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव यापुढे ‘राजभवन’ ऐवजी ‘लोकभवन’ असे असेल”, असे अधिसूचनेत म्हटले आहे. हा बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘राजभवन’ हे नाव ब्रिटिश राजवटीपासून चालत आलेले असून, स्वातंत्र्यानंतरही देशातील बहुतांश राज्यांमध्ये राज्यपालांचे निवासस्थान ‘राजभवन’ या नावानेच ओळखले जाते. मात्र आता ‘राज’ हा शब्द हटवून ‘लोक’ हा शब्द वापरण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “राजेशाही खुणा पुसून टाकण्याचा आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने जनभावनेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. ‘लोकभवन’ हे नाव सर्वसमावेशक आहे”, असे त्यांना सांगितले. पुढील काही दिवसांत सर्व अधिकृत पत्रव्यवहार, नामफलक आणि आणि संकेतस्थळावरही हा बदल केला जाणार आहे.

Comments
Add Comment

नॅशनल पार्क बंद : आदिवासींच्या घरावर बुलडोझर, आंदोलकांनी केली दगडफेक

बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आदिवासींच्या बेकायदा घरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या

नवी मुंबई विमानतळाला मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणार

महायुती सरकारचा निर्णय; 'मेट्रो-८'च्या जोडणीस मान्यता, २२ हजार ८६२ कोटींचा खर्च अपेक्षित मुंबई : जगातील प्रमुख

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

मुखमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे निर्दश समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा -

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची "चार्जिंग!”

ईव्ही स्थानकांना प्राधान्य देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश मुंबई : बदलत्या काळाची चाहूल

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे

प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला गालबोट; स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

सोमवार २६ जानेवारी रोजी स्पीकर कोसळून एका तीन वर्षांच्या चिमूरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विक्रोळी