सरकारकडून सारथी ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय मागे, लोकाग्रहास्तव सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: आज अखेर सरकारने लोकाग्रहास्तव आपला निर्णय मागे घेतला आहे. सरकारने आज लोकसभेत देखील लोकांच्या सुरक्षिततेला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. खरं तर सरकारने लोकांच्या सुरक्षेतर सारथी ॲप इन्स्टॉलेशन अनिवार्य करण्याचा अध्यादेश जारी केला होता. मात्र अधिवेशनातील स्पष्टीकरणानंतर सरकारने प्रसिद्ध पत्रक काढून निर्णय मागे घेतला आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात वाढलेल्या प्रतिसादानंतर स्मार्टफोन उत्पादकांसाठी हे ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. यापूर्वी ॲपल कंपनीनेही या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. आज अधिवेशन सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सारथी ॲप मधून कुठलाही डेटा चोरी अथवा हेरगिरी करण्याचा हेतू नाही. या माध्यमातून हेरगिरी होणार नाही. हा केवळ सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय घेण्यात आला होता. या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा डेटा गैरवापर करण्यात येणार नाही. या ॲपमधून स्नूपिंग (Snooping) शक्य नाही आणि होणारही नाही. तरीही सरकार आलेल्या अभिप्रायासहित नव्या बदलांसाठी विचाराधीन असणार आहे ' असे बोलताना म्हटले आहे.


यावर विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात सरकारच्या निर्णयावर मोर्चा बांधणी केली होती. मात्र सरकारने कुठल्याही प्रकारचा 'पेगासिस' प्रकार नसून लोकहितासाठी घेतलेला हा निर्णय घेतला गेला असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. मात्र सरकारने गैरसमज दूर करण्यासाठी व निश्चित येणारे अभिप्राय स्विकारण्यासाठी हा निर्णय मागे घेतला असून कुठल्याही ग्राहकांना सॉफ्ट अपडेटमधून अथवा स्मार्टफोन उत्पादन (Manufacturer) प्री- इन्स्टॉलेशन कंपन्याना बंधनकारक नसणार आहे.


'जर तुम्हाला अ‍ॅप हटवायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. ते अनिवार्य नाही' असे सिंधिया म्हणाले. जर कोणी नोंदणी न करण्याचा निर्णय घेतला तर अ‍ॅप निष्क्रिय राहील. आमची जबाबदारी फक्त नागरिकांना हे उपकरण त्यांच्या सुरक्षिततेसाठी अस्तित्वात आहे हे कळवणे आहे याची खात्री करणे आहे,' असे ते लोकसभेत बोलणं पुढे म्हणाले आहेत. संचार साथीचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांना खरेदी करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख (IMEI) क्रमांकाद्वारे हँडसेटची सत्यता पडताळण्यास मदत करणे होते.

Comments
Add Comment

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह नऊ राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या केल्या असून

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

नवी मुंबईत घरगुती ट्युशन क्लासचा स्लॅब कोसळला, एका मुलाचा मृत्यू आणि १० मुले जखमी

कोपरखैरणे : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर दोनमधील प्लॉट क्रमांक १२ येथे विद्याभवन अपार्टमेंटमधील

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग