राज्यातील २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होणार असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.


नगर परिषदा व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकूण १७ हजार ३६७ कंट्रोल युनिट, तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिटचा समावेश आहे. अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मतदान पथके मतदान केंद्रावर सुरळीत पोहोचली आहेत. उद्या सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होईल. सांयकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल.


राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय २३ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर आल्याने २४ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार नाही. तेथे सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील ७६ नगर परिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित १५४ जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी २० डिसेंबर २०२५रोजी मतदान होईल.

Comments
Add Comment

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.

PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली

Minister Pratap Sarnaik : एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना 'नो एन्ट्री'; मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

- अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'