भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती कारवाई करत आहोत, असे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले. त्रिपाठींच्या या वक्तव्याने पाकिस्तानला धडकीच भरली असल्याचे वृत्त आहे.


मे महिन्यात पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतसह कॅरिअर बॅटल ग्रुप आक्रमक स्थितीत सज्ज ठेवला. हे बघून पाकिस्तान घाबरला, त्यांची स्वतःच्या युद्धनौका बाहेर काढण्याची हिंमतच झाली नाही. पाकिस्तानच्या युद्धनौका बंदरातच नांगर टाकून उभ्या राहिल्या. मागील सात महिन्यांपासून भारतीय नौदलाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान सतत दबावात आहे; असे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले.


'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षा आणि नौदलाच्या क्षमतेचा खास उल्लेख केला होता. याबद्दल ॲडमिरल त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी वर्षभरातील नौदलाच्या कामगिरीची माहिती आकडेवारीच्या स्वरुपात जाहीर केली.


५०,००० तास उड्डाण (फ्लाइंग) केले.


५२ समुद्री चाच्यांना (Pirates) पकडले.


समुद्रात ५२० लोकांचे जीव वाचवले.


समुद्रामध्ये ११,००० जहाज-दिवस (ship-days) घालवले.


४३,३०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले.


समुद्री चाचेगिरी विरोधी मिशनवर (Anti-Piracy Mission) ४० जहाजे पाठवली.


वेगवेगळ्या मिशनवर १३८ जहाजे तैनात केली.


१३८ युद्धनौकांनी (warships) ७,८०० व्यापारी जहाजांना (merchant vessels) सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत केली.


२००८ पासून आजपर्यंत एडनच्या आखातात (Gulf of Aden) एक जहाज नेहमीच तैनात असते.


लाल समुद्रात (Red Sea) हौथी (Houthi) हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ४० मोठी युद्धनौके तैनात केली, ज्यामुळे ५.६ अब्ज डॉलर (Billion) किमतीचा माल सुरक्षितपणे पार पडला.


ऑपरेशन सागर बंधू (Operation Sagar Bandhu) अंतर्गत श्रीलंकेला INS विक्रांत आणि INS उदयगिरीने १२ टन, तर INS सुकन्याने १०-१२ टन मदत सामग्री पोहोचवली.


गेल्या वर्षीच्या नौदल दिवसापासून (Navy Day) आतापर्यंत आम्ही १ नवीन पाणबुडी (Submarine) १२ नवीन युद्धनौका (Warships) नौदलात सामील केल्या


INS उदयगिरी भारतीय नौदलाची १०० वी युद्धनौका (Warship)


भारताचे प्रत्येक जहाज आणि देशाचा प्रत्येक नौसैनिक हा प्रत्येक क्षणी तयार असतो. ऑपरेशन सिंदूर असो वा लाल समुद्रातील हुती दहशतवाद्यांना धडा शिकवणं असो, समुद्री चाच्यांना पकडणे किंवा श्रीलंकेत मदत पोहचवणं. भारतीय नौदल आज जगातील सर्वात सतर्क, शक्तीशाली आणि मानवीय दृष्टीकोणातून सर्वात चांगल्या नौदलांपैकी एक आहे. पाकिस्तानची झोप उडाली आहे कारण त्यांना माहिती आहे की आमचा कॅरिअर बॅटल ग्रुप अजूनही अरबी समुद्रात तैनात आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही; असेही भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले.

Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या