केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची सावली गडद होत चालली आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी निधी उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड (केआयआयएफबी) विरुद्ध परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात फेमा उल्लंघन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली असून, ४६६ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या बोर्डाचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री पिनारायी विजयन असल्याने हा विषय अधिकच गंभीर स्वरूप धारण करत आहे.



१२ नोव्हेंबर २०२५ रोजी ईडीने केआयआयएफबी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. आरोपानुसार, केआयआयएफबीने लंडन व सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजवर ‘मसाला बाँड’ जारी करून तब्बल २,६७२ कोटी रुपये उभे केले आणि हा निधी बाह्य व्यावसायिक कर्जाच्या स्वरूपात प्राप्त झाला. ईडीचे म्हणणे आहे की या रकमेतून ४६६.९१ कोटी रुपये जमीन खरेदीसाठी वापरण्यात आले; परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार मसाला बाँडद्वारे जमा झालेला निधी जमीन खरेदीसाठी वापरण्यास मनाई आहे. यामुळे आरबीआयच्या मास्टर डायरेक्टिव्ह २०१६, परिपत्रक २०१५ आणि १ जून २०१८ च्या नियमांचे थेट उल्लंघन झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. या प्रकरणावर ईडीने २७ जून २०२५ रोजी अधिकृत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर निर्णय प्राधिकरणाने प्रकरणाची प्राथमिक छाननी करून नोव्हेंबरमध्ये नोटीस जारी केली.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला