निवडणूक रणधुमाळीमध्ये बुलढाण्यात गोंधळ; बोगस मतदाराला नागरिकांकडून चोप

बुलढाणा : राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार पकडल्याची घटना समोर आली. नागरिकांनी या तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काही क्षणातच हा बोगस मतदार पोलिसांच्या हातातून निसटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.


घटनेदरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कुणाल गायकवाड हे पकडलेल्या तरुणाचा बचाव करताना, तसेच उपस्थित पोलिसांशी उध्दट वर्तन करताना दिसत आहेत. कुणाल यांनी पोलिसांना धमकावत बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता पुढे ढकलण्यात आले आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेत काही तांत्रिक कारणे आणि प्रलंबित अपीलांमुळे काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत.

Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल