प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने काल (३० नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखेनुसार २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणूका पार पडणार होत्या. मात्र राज्यातील काही ठिकाणी २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणूका आता २० डिसेंबरला पार पडणार आहेत. यामध्ये अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे.


यानिर्णयाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीकरता मतदान २ डिसेंबरला होणार की २० डिसेंबरला याबाबत अंबरनाथ निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडेही स्पष्ट उत्तर नसल्याने अंबरनाथचे मतदार आणि निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत. कारण अंबरनाथ नगरपरिषदेकरता होणारे मतदान नेमकं कधी आहे? यावर अधिकृत उत्तर नसल्याचे निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड आणि अमित पुरी यांनी पत्रकार परीषद घेत सांगितले.


मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीकरता मतदान २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन्ही दिवशी होणार असून ज्या ११ वॉर्डातील उमेदवारांनी अपील केले होते, फक्त त्याच ११ वॉर्डातील निवडणुकांकरिता २० डिसेंबरला मतदान होईल. अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेच्या काही प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Dombivli News : एकाने डोळे झाकले, दुसरा रील काढत होता अन् तिसरा...मोठागाव-माणकोली पुलावर स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवली : स्टंटबाजी आणि रिल्सच्या नादात स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांना आता पोलिसांचा दणका

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना