प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने काल (३० नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखेनुसार २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणूका पार पडणार होत्या. मात्र राज्यातील काही ठिकाणी २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणूका आता २० डिसेंबरला पार पडणार आहेत. यामध्ये अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे.


यानिर्णयाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीकरता मतदान २ डिसेंबरला होणार की २० डिसेंबरला याबाबत अंबरनाथ निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडेही स्पष्ट उत्तर नसल्याने अंबरनाथचे मतदार आणि निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत. कारण अंबरनाथ नगरपरिषदेकरता होणारे मतदान नेमकं कधी आहे? यावर अधिकृत उत्तर नसल्याचे निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड आणि अमित पुरी यांनी पत्रकार परीषद घेत सांगितले.


मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीकरता मतदान २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन्ही दिवशी होणार असून ज्या ११ वॉर्डातील उमेदवारांनी अपील केले होते, फक्त त्याच ११ वॉर्डातील निवडणुकांकरिता २० डिसेंबरला मतदान होईल. अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेच्या काही प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या